Sunil Gavaskar wants Rohit should let Ashwin lead in fifth Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचवा कसोटी सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आर अश्विनसाठी एक खास मागणी केली आहे. सुनील गावसकरांच्या मते भारतीय कर्णधार रोहित शर्माने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यासाठी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संधी द्यावी, ज्याचा १०० वा कसोटी सामना आहे.

धरमशाला येथे अश्विनला कर्णधारपदाची संधी मिळावी –

रविचंद्रन अश्विन सध्या रांचीमध्ये ९९ वा कसोटी सामना खेळत आहे. या ३७ वर्षीय गोलंदाजाने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ५१ धावांत 5 बळी घेतले. एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची अश्विनची ही ३५वी वेळ आहे. रविवारी जियो सिनेमावर अश्विनशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, ‘उद्या भारत जिंकेल आणि त्यानंतर संघ पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी धर्मशालाला जाईल. मला विश्वास आहे की,
रोहित तुम्हाला या मैदानावर संघाचे नेतृत्व करण्याची संधी देईल. भारतीय क्रिकेटसाठी तुम्ही जे काही केले आहे ते लक्षात घेता हा एक उत्कृष्ट सन्मान असेल.’

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Jos Buttler Takes Dig at India After Pune Concussion Substitue of Harshit Rana in IND vs ENG
IND vs ENG: जोस बटलरने नाणेफेकीदरम्यान भारताला लगावला सणसणीत टोला, हर्षित राणाच्या मुद्द्यावरून पुन्हा सुनावलं
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Bhokardan , Raosaheb Danve,
‘माजी’ झाल्याने फरक पडत नाही, फक्त नाव पुरेसे, माजी खासदार रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : Gautam says Sourav Ganguly apna jack laga ke aaya Manoj Tiwary has revealed
Manoj Tiwary : ‘तो जॅक लावून आला आणि तू पण…’, गंभीरने गांगुलीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; मनोज तिवारीचा खुलासा

अश्विनने काय दिली प्रतिक्रिया –

प्रत्युत्तरादाखल अश्विनने सांगितले की, तो संघात जितका जास्त काळ टिकेल तितके त्याच्यासाठी चांगले होईल. अश्विन म्हणाला, ‘सनी भाई तुमचे मन खूप उदार आहे. याबद्दल धन्यवाद. परंतु मला वाटतं की मी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलो आहे. मी या टीमसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. हे जितका जास्त काळ टिकेल तितका मला आनंद होईल.’

हेही वाचा – VIDEO : ‘काही सेकंद बाकी, सर्वांनी डोकं लावा…’, डीआरएसबाबत रोहित शर्मा गोंधळला, शेवटच्या क्षणी घेतला निर्णय

अश्विनच्या कसोटी क्रिकेटमध्ये ५०७ विकेट्स –

रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ९९ कसोटी सामन्यांमध्ये ५०७ बळी घेतले आहेत. अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून ६१९ विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुथय्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० बळी घेतले आहेत. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, रविचंद्रन अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ३५ वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनला (०) बाद करून ही कामगिरी केली.

हेही वाचा – IND vs ENG : जुरेलच्या शानदार खेळीनंतर वीरेंद्र सेहवागने मीडियाकडे ‘ही’ मागणी केल्याने सर्फराझचे चाहते संतापले

भारत मालिका विजयाच्या जवळ –

अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या ९ विकेट्सच्या जोरावर भारताने रांची येथील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रविवारी इंग्लंडला दुसऱ्या डावात १४५ धावांत गुंडाळले. यानंतर १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता ४० धावा करत आपला वरचष्मा कायम ठेवला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा २४ धावांवर खेळत होता, तर त्याचा सहकारी सलामीवीर यशस्वी जैस्वाल १६ धावांवर खेळत होता. भारताला आता विजयासाठी १५२ धावांची गरज असून सर्व १० विकेट्स शिल्लक आहेत. या डावात रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार धावाही पूर्ण केल्या.

Story img Loader