IND vs NZ Tom Latham reaction after the historic win : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताला १३२ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताने १२ वर्षांनंतर मायदेशात पहिली कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझीलंडने ६९ वर्षांनंतर भारताचा बालेकिल्ला भेदत पहिली कसोटी मालिका जिंकली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथम खूपच आनंदी दिसत होता. लॅथमने टीम इंडियाविरुद्धची मालिका २-० ने जिंकल्यानंतर या विजयाचे श्रेय दोन खास खेळाडूंना दिले.

टॉम लॅथम काय म्हणाला?

न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने भारताविरुद्ध ऐतिहासिक मालिका जिंकण्याचे श्रेय मिचेल सँटनरला दिले. या फिरकीपटूने पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा, अशा एकूण १३ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे त्याने दोन्ही डावाता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला बाद केले. त्याच्या फिरकीचा सामना करताना भारताचे हतबल दिसले. याच कारणामुळे किवी कर्णधाराने त्याला विजयाचे श्रेय दिले.

Rishabh Pant cryptic insta story
Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला सोडणार? इन्स्टावर शेअर केलेल्या स्टोरीने वेधलं सर्वांचं लक्ष
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ…
IND vs NZ Tom Latham reaction to the win
IND vs NZ : ‘आम्हीही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम…’, ऐतिहासिक विजयानंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराचा मोठा खुलासा
IND vs NZ Rachin Ravindra reveals how CSK helped to him prepare to beat India
IND vs NZ : रचिन रवींद्रने भारताला हरवण्यासाठी केली होती जोरदार तयारी; धोनीच्या संघाने दिली साथ, सामन्यानंतर केला मोठा खुलासा
Sai Sudharsan slams double century for Tamil Nadu against Delhi in Ranji Trophy 2024 Elite Group
Sai Sudharsan : साई सुदर्शनने टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी ठोकला दावा, दिल्लीविरुद्ध झळकावले वादळी द्विशतक
Rohit Sharma Statement on India All Out At 46 and Batting First Decision After Winning Toss In Press Conference IND vs NZ
Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?
IND vs BAN 3rd T20I Sanju Samson credited captain Suryakumar Yadav and coach Gautam Gambhir
IND vs BAN : ‘मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनच्या प्रतिक्रियेने टीम इंडियासह चाहत्यांची जिंकली मनं
IND vs BAN Suryakumar Yadav Statement on India Series Win He Said No One is Bigger Than The Team
IND vs BAN: “संघापेक्षा कोणीही मोठं नाही…”, भारताच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य, कर्णधार असं नेमकं का म्हणाला?

टॉम लॅथमने विजयाचे श्रेय मिचेल सँटनरला दिले –

टॉम लॅथम म्हणाला, ‘हा ऐतिहासिक विजय आमच्यासाठी खूपच खास आहे. आमच्या संपूर्ण टीमने एकजूटीने प्रयत्न केल्याने हा मोठा विजय मिळवू शकलो. यामध्ये मिचेल सँटनरचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण त्याचा या विजयात सर्वांत जास्त मोलाचा वाटा होता. त्याने दोन्ही डावात विलक्षण गोलंदाजी केली. तो बराच काळ या संघाचा भाग आहे आणि शेवटी त्याला खेळण्याची संधी मिळाली, ज्याचे त्याने सोने केले. या सामन्यात त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे या विजयाचे श्रेय त्याला जाते.’

हेही वाचा – IND vs NZ : २४ वर्षांत टीम इंडियावर तिसऱ्यांदा ओढवली नामुष्की; मायदेशात गमावले सलग दोन कसोटी सामने

टॉम लॅथमकडून ग्लेन फिलिप्सचे कौतुक –

ग्लेन फिलिप्सबद्दल बोलताना टॉम लॅथम म्हणाला, ‘आज सकाळी ग्लेन फिलिप्स ज्या प्रकारे खेळला, त्याची खेळी खरोखरच महत्त्वाची होती. भारतीय संघ पुनरागमन करणार करेल हे आम्हाला माहीत होते. मात्र, ते इतक्या चांगल्या प्रकारे पुनरागमन करतील हे आम्हाला माहित नव्हते, परंतु आम्ही मधल्या सत्रात विकेट्स घेण्यात यशस्वी झालो. आम्हाला शेवटच्या दोन विकेट्स घ्यायला खूप वेळ लागला, पण जेव्हा टिमने कॅच घेतला, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही.’

दुसऱ्या सामन्यात टॉम लॅथमने अतिशय शानदार खेळी साकारली. दुसऱ्या डावात त्याने ८६ धावा केल्या, त्यामुळे न्यूझीलंडला भारताविरुद्ध दुसऱ्या डावात २५५ धावा करण्यात यश आले. तसेच, किवी संघाने पहिल्या डावात १०३ धावांची मोठी आघाडी घेतली होती, त्यामुळे भारताला तिसऱ्या दिवशी ३५९ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला खूप घाम गाळावा लागला.

हेही वाचा – IND vs NZ : पुण्यात पानिपत; १२ वर्षानंतर भारतीय संघाने मायदेशात गमावली कसोटी मालिका

टीम इंडियाने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली –

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पहिल्या डावात २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ अवघ्या १५६ धावांवर गारद झाला. ज्यामुळे पाहुण्या संघाने १०३ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात किवी संघाने २५५ धावा केल्या. ज्यामुळे न्यूझीलंडने ३६२ धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य गाठण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आणि परिणामी संपूर्ण संघ २४५ धावांत गारद झाला. अशा प्रकारे न्यूझीलंडविरुद्ध ११३ धावांनी पराभूत झाल्यामुळे भारताला १२ वर्षांनंतर मायदेशात मालिका गमावावी लागली.