IND vs NZ Virat Kohli Axar Patel : श्रेयस अय्यरची ७९ धावांची खेळी, वरूण चक्रवर्तीचे ५ बळी व फिरकीपटूंच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडला नमवत ४४ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या फिरकीपटू चौकडीने ९ बळी घेत किवी फलंदाजांना वेसण घातली. या विजयासह भारताने अ गटाच्या गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत गाठली आहे. यासह भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. या सामन्यात भारताची सुरूवात खूपच खराब झाली. भारताने ३० धावांमध्ये ३ फलंदाज गमावले होते. यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलच्या साथीने ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यरने ७९ धावांची तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेत भारताला मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा