Asia Cup 2023, India vs Pakistan Super 4 score Updates: आज कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर-४चा सामना खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला आणि सामना राखीव दिवसापर्यंत पुढे ढकलण्यात आला. सोमवारी, सामना भारतीय डावाच्या जिथे थांबला होता तिथूनच सुरू होईल आणि सामना ५०-५० षटकांचा खेळला जाईल.

कोलंबोमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अशा स्थितीत संपूर्ण मैदानात कव्हर्स टाकण्यात आले आहे. आता हा सामना राखीव दिवशी होणार आहे. आज सामना पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे हा सामना आता सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. पावसामुळे आज जिथे थांबला होता तिथूनच हा सामना सुरू होईल. म्हणजेच सामना भारतीय डावाच्या २४.१ षटकांपासून सुरू होईल. सोमवारी फक्त ५०-५० षटकांचे सामने खेळवले जातील. उद्याही पाऊस पडला तर डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल.

IND vs ENG ODI Series Full Schedule Timings and Squads in Detail India England
IND vs ENG: भारत वि इंग्लंड वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक वाचा एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
India Highest Powerplay Score in T20I 95 Runs IND vs ENG 5th T20I Abhishek Sharma Century
IND vs ENG: अभिषेक शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, टी-२० पॉवरप्लेमध्ये उभारली सर्वाेच्च धावसंख्या
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
Varun Chakravarthy 5 Wicket Haul IND vs ENG 3rd T20I Rajkot Watch Video
IND vs ENG: वरूण चक्रवर्तीने ५ विकेट्स घेत घडवला इतिहास, बुमराह-शमी कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
aaditya thackeray (1)
Maharashtra News : देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्याबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, “काही गोष्टी लवकरच समोर येतील”

आज सामना सुरू असताना काही तास पाऊस थांबला होता, मात्र मैदान ओले असल्याने त्याची दुरुस्ती करण्यास ग्राउंड स्टाफला वेळ लागला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही तासांनी पाऊस थांबला. मात्र, आऊटफील्ड ओले होते. रात्री ८.३० वाजता अंपायर्सनी पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. रात्री नऊ वाजता खेळ सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र, साडेनऊ वाजता पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला आणि अंपायर्सनी सामना राखीव दिवशी हलविण्याचा निर्णय घेतला.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने २४.१ षटकांत २ गडी गमावून १४७ धावा केल्या. सध्या के.एल. राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे. आज कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिलचे वादळ पाहायला मिळाले. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने तोडली, त्याने कर्णधार रोहितला बाद केले.

हिटमॅनने आपले ५०वे अर्धशतक झळकावले. त्याने ४९ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. दुसरीकडे त्याचा साथीदार शुबमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. त्याला शाहीन आफ्रिदीने आगा सलमानकरवी झेलबाद केले. शुबमन ५२ चेंडूत दहा चौकारांच्या मदतीने ५८ धावा करून बाद झाला.

टीम इंडियाने २४.१ षटकात २ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या. सध्या के.एल. राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे. या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. त्यानंतरही सामना सुरू झाला नाही, तर भारतीय संघ २४.१ षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल.

Story img Loader