India vs Pakistan, World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बर्यापैकी संघांनी आपले प्रत्येकी दोन सामने खेळले आहे. या स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज सामना शनिवारी (१४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांत खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्याची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहे. या दोन्ही संघातीलभारतीय भूमीवरील सामन्यांबद्ल बोलायचे, तर एकदिवसीय फॉर्मेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. मात्र, आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही सामना जिंकण्यात यश आलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानने भारतीय भूमीवर भारताविरुद्ध जिंकलेत अधिक सामने –

भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर एकूण ३० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने १९ सामने जिंकले आहेत, तर भारताने ११ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धचा विक्रम भारतीय भूमीवर अधिक चांगला दिसतो.

एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यात टीम इंडियाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. १९९६ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय भूमीवर खेळला गेला होता, ज्यामध्ये पाकिस्तान संघाचा पराभव झाला होता. या सामन्यात भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होता. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ येथे दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. त्यावेळी भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला होता. एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर सामना रंगण्याची ही तिसरी वेळ असेल.

हेही वाचा – NZ vs BAN, World Cup 2023: नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान संघाला कमी लेखता येणार नाही. या संघाचा कर्णधार बाबर आझमची कामगिरी चांगली नसली, तरी इतर फलंदाज मात्र आपले काम चोख बजावत आहेत. या टीममध्ये मोहम्मद रिझवानच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेविरुद्ध विक्रमी धावांचे आव्हान गाठले गेले. साहजिकच रोहित शर्माच्या संघाला पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनीही आपले पहिले दोनही सामने जिंकले आहेत.

पाकिस्तानने भारतीय भूमीवर भारताविरुद्ध जिंकलेत अधिक सामने –

भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर एकूण ३० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने १९ सामने जिंकले आहेत, तर भारताने ११ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धचा विक्रम भारतीय भूमीवर अधिक चांगला दिसतो.

एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यात टीम इंडियाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. १९९६ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय भूमीवर खेळला गेला होता, ज्यामध्ये पाकिस्तान संघाचा पराभव झाला होता. या सामन्यात भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होता. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ येथे दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. त्यावेळी भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला होता. एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर सामना रंगण्याची ही तिसरी वेळ असेल.

हेही वाचा – NZ vs BAN, World Cup 2023: नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान संघाला कमी लेखता येणार नाही. या संघाचा कर्णधार बाबर आझमची कामगिरी चांगली नसली, तरी इतर फलंदाज मात्र आपले काम चोख बजावत आहेत. या टीममध्ये मोहम्मद रिझवानच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेविरुद्ध विक्रमी धावांचे आव्हान गाठले गेले. साहजिकच रोहित शर्माच्या संघाला पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनीही आपले पहिले दोनही सामने जिंकले आहेत.