भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे फक्त या दोन देशांमध्येच नाही, तर जगभरातल्या क्रिकेट प्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय असतो. रविवारी आशिया चषक २०२३च्या सुपर फोरमधील लढतीत भारतानं केलेली सुरुवात याच उत्सुकतेला सार्थ ठरवणारी ठरली. रोहित शर्मा व शुबमन गिलनं भारताला १२१ धावांची तडाखेबंद सुरुवात करून दिल्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं टॉस जिंकून आधी बॉलिंग करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर टीका होऊ लागली. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून जगभरातल्या फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या शोएब अख्तरनं यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

काय झालं रविवारी?

रविवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुपर फोर फेरीचा सामना सुरू झाला. मात्र, आधीच अंदाज वर्तवण्यात आल्याप्रमाणे पावसानं हजेरी लावली आणि सामना अर्धवटच राहिला. पाऊस येण्याआधी भारतानं पहिली बॅटिंग करताना २ गड्यांच्या मोबदल्यात २४.१ षटकांमध्ये १४७ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहली व के. एल. राहुल भारताच्या डावाला आकार देत होते. मात्र, अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळे खेळ थांबवला. पुढचे ४ तास न पडलेला पाऊस पुन्हा रात्री ९ च्या सुमारास सुरू झाला आणि खेळ राखीव दिवशी म्हणजे आज खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
Delhi Assembly Elections BJP Third Manifesto
भाजपचा तिसरा जाहीरनामा; तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन
Ravindra Jadeja 12 wickets help Saurashtra beat Delhi by 10 wickets in Ranji Trophy 2025 Elite Group match
Ranji Trophy 2025 : जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्राने पंतच्या दिल्लीचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा

शोएब अख्तर म्हणाला, “पावसानं वाचवलं!”

दरम्यान, एकीकडे मैदानात पाऊस पडत असल्यामुळे सामना थांबला होता. सर्व क्रिकेटप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडलं होतं. पण दुसरीकडे पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनं पावसानं पाकिस्तानला वाचवल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मैदानाबाहेर रेकॉर्ड केलेला व्हिडीओ शोएबनं आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला असून त्यात त्यानं बाबर आझमच्या निर्णयालाही लक्ष्य केलं आहे.

“मित्रांनो, मी सामना बघायला आलो होतो. आम्ही सगळे चाहतेही वाट बघत होतो. भारतीय व पाकिस्तानीही. पण अखेर पावसानं आज आम्हाला वाचवलं. त्या दिवशी पावसानं भारताला वाचवलं होतं. आज आम्ही भारतासमोर अडचणीत सापडलो असताना पावसानं आम्हाला वाचवलं. बरं झालं पाऊस आला”, असं शोएब अख्तरनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

IND vs PAK: जसप्रीत बुमराहच्या मुलाला शाहीन आफ्रिदीकडून मिळाले खास गिफ्ट! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला VIDEO

“कोलंबोचा पाऊस म्हणजे वेडेपणा”

दरम्यान, कोलंबोत अचानक वेगाने आलेल्या पावसाचं वर्णन करताना शोएब अख्तरनं आपल्या ट्वीटमध्ये “मला वाटत नाही आज (रविवारी) खेळ पुन्हा सुरू होईल. कोलंबोमध्ये वेड्यासारखा पाऊस पडतो”, असं म्हटलं आहे.

बाबर आझमची अप्रत्यक्ष कानउघाडणी

दरम्यान, आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या बाबर आझमला शोएब अख्तरनं अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. “मला आशा आहे की हा सामना पूर्ण व्हावा. सोमवारी इथे खेळ व्हावा आणि बाबर आझमनं आधी बॉलिंग न करण्याचा निर्णय घ्यावा”, असं अख्तर या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

Story img Loader