Virat Kohli and Rohit Sharma T20 World Cup 2024: बीसीसीआयने गुरुवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. तिन्ही फॉरमॅटसाठी तीन कर्णधार बनवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे संघाची घोषणा करताना बीसीसीआयने लिहिले की, “रोहित शर्मा आणि विराट कोहलीने या दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून विश्रांती मागितली होती, जी त्यांना देण्यात आली आहे.” म्हणजेच या टिप्पणीतून एक गोष्ट निश्चित आहे की, दोघांनाही टी-२० मध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे. विराट आणि रोहित टी-२० विश्वचषकासाठी पुनरागमन करतील, असे मानले जात आहे.

आयपीएलनंतर या प्रकरणावर निर्णय होऊ शकतो. रोहितसमोर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कर्णधारपदाचा प्रस्तावही देण्यात आली होती, मात्र त्याने सध्यातरी त्याने या प्रस्तावास नकार दिला आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सूर्यकुमार यादव टी-२० आणि के.एल. राहुल वन डेमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहेत. त्याचवेळी रोहित आणि विराट कसोटीत पुनरागमन करणार आहेत.

Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Mohammed Shami Makes International Comeback After 435 Days Playing in IND vs ENG 3rd T20I
IND vs ENG: अखेरीस प्रतिक्षा संपली! मोहम्मद शमीचं ४३५ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

रोहितचे पुनरागमन झाल्यास हार्दिक उपकर्णधार होईल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर रोहितने टी-२० मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला तर पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टी-२०च्या कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याला संधी मिळणार नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “रोहितला टी-२० कर्णधारपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे, परंतु तो या सुट्टीमध्ये ब्रिटनमध्ये आहे आणि चार महिन्यांच्या व्यस्त हंगामानंतर त्याला विश्रांती हवी होती. कर्णधार म्हणून त्याला ड्रेसिंग रुममध्ये सर्वात जास्त आदर आहे आणि जर तो टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करण्यास सहमत असेल तर तोच कर्णधार असेल.”

हेही वाचा: World Cup: विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेल्या मिचेल मार्शचे बेताल वक्तव्य; म्हणाला, “मी पुन्हा तसेच…”

आयपीएल २०२४ पासून निर्णय घेतला जाऊ शकतो

वृत्तानुसार, रोहितला ५० षटकांच्या क्रिकेट आणि विश्वचषकावर लक्ष केंद्रित करायचे असल्याने २०२२च्या टी-२० विश्वचषक नंतर सर्वात लहान स्वरूप खेळण्यास तो तयार नव्हता. मात्र, रोहित टी-२० विश्वचषकात पुनरागमन करू शकतो, कारण वेळोवेळी हार्दिकच्या दुखापतीच्या समस्येने निवडकर्त्यांच्या मनात शंका निर्माण केल्या आहेत. तसेच, हार्दिक ज्या प्रकारे मुंबईत परतला त्यामागे रोहितची भूमिका असावी.

अशा परिस्थितीत रोहितने पुनरागमन करून त्याला कर्णधारपद दिल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. मात्र, त्याचा निर्णय थेट आयपीएलमध्ये घेतला जाऊ शकतो. पुढील आयपीएल हंगामात हार्दिक संघाचा कर्णधार बनतो की रोहितच्या नेतृत्वात खेळतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. जर हार्दिकच्या नेतृत्वात रोहित आयपीएलमध्ये खेळला तर रोहित विश्वचषकातही त्याच्या हाताखाली खेळण्यास तयार होऊ शकतो अन्यथा रोहित परतणार नाही हे स्पष्ट होईल.

हेही वाचा: IND vs SA: पुजारा-रहाणेची कारकीर्द संपली? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून पत्ता कट झाल्याने सोशल मीडियात चर्चेला उधाण

भारताला आठ टी-२० सामने खेळायचे आहेत

पुढच्या मोसमात रोहितने संघाचे नेतृत्व केले तर तो टी-२० विश्वचषकात पुनरागमन करेल अशी शक्यता आहे. इतकंच नाही तर टी-२० विश्वचषकापूर्वी भारताला जास्त टी-२० खेळण्याची गरज नाही. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सह, टीम इंडिया सध्याच्या वेळापत्रकानुसार टी-२० विश्वचषकापर्यंत एकूण आठ टी-२० सामने खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित दोन सामने, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन टी-२० आणि त्यानंतर जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात तीन टी-२० सामने. यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ती संपल्यानंतर आयपीएल सुरू होईल आणि त्यानंतर जूनमध्ये टी-२० विश्वचषक होईल. म्हणजेच रोहितच्या टी-२०मध्ये पुनरागमनाची सध्या तरी शक्यता नाही. विराटही आयपीएलमधूनच छोट्या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Story img Loader