भारत आणि श्रीलंका संघात दुसरा टी-२० सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी श्रीलंका करताना ६ बाद २०६ धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला २०७ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात भारतीय संघाने अनेक चुका केल्या आहेत. ज्याचा फटका भारतीय संघाला बसला.

सर्वात प्रथम हार्दिकने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यान सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण पुण्याच्या खेळपट्टीचा इतिहास पाहिला, तर येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा वरचष्मा आहे. मग पांड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? प्रश्न उपस्थित होत आहे. हार्दिकच्या या निर्णयामुळे चाहत्यांना नक्कीच थोडे आश्चर्य वाटले आहे. क्षेत्ररक्षण निवडण्याच्या निर्णयावर हार्दिकने दिलेली प्रतिक्रिया अधिक आश्चर्यकारक होती.

India vs England 5th T20 LIVE Score Updates in Marathi
IND vs ENG 5th T20I Highlights : अभिषेकच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर भारताचा मोठा विजय! इंग्लंडचा १५० धावांनी केला दारुण पराभव
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
India vs England 4th T20 Highlights in Marathi
India vs England 4th T20I Highlights: हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लडला चारली धूळ
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

नाणेफेक करण्यासाठी आलेल्या मुरली कार्तिकने हार्दिकला त्याच्या निर्णयाबद्दल विचारले, तेव्हा क्षेत्ररक्षण निवडताना कर्णधार म्हणाला, “ही खेळपट्टी चांगली दिसत आहे. आम्ही येथे विकेट मिळवू शकतो. कदाचित दव देखील येईल.” यावर कार्तिकने प्रश्न विचारला की या मैदानावर अनेकदा प्रथम फलंदाजी करणारा संघ सामना जिंकतो. आकडेवारी या वस्तुस्थितीची साक्ष देतात. यावर हार्दिकने प्रत्युत्तर दिले की, “खरंच असं आहे का, मला हे माहीत नव्हतं.”

हेही वाचा – IND vs SL 2nd T20: अर्शदीप सिंगने केला नकोसा विक्रम; एकाच सामन्यात टाकले तब्बल ‘इतके’ नो बॉल

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये ७५ टक्के सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी २०६ हेच खरे असल्याचे सिद्ध केले.

सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने १२ षटकांच्या समाप्तीनंतर ५ बाद ८५ धावा केल्या आहेत. आता भारताला ४७ चेंडूत १२७ धावांची गरज आहे. सध्या खेळपट्टीवर अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव फलंदाजी करत आहे.

Story img Loader