शिवम मावीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी करताना २२ धावांत ४ बळी घेतले. त्यामुळे हा सामना २ धावांच्या फरकाने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करतााना १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ १६० धावाच करू शकला. या सामन्यानंतर शिवम मावीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारताकडून दीपक हुड्डा, इशान किशन आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर शिवम व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनीही २-२ बळी घेतले. टी-२० मालिकेतील दुसरा सामना गुरुवार, ५ जानेवारी रोजी होणार आहे. बीसीसीआयने शिवम मावीसोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Harshit Rana makes T20I debut as concussion substitute against England
IND vs ENG: हर्षित राणाचं चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अनोखं पदार्पण, पहिल्याच षटकात घेतली विकेट; नेमकं काय घडलं?
Shardul Thakur take hat trick against Meghalaya for Mumba in Ranji Trophy 2025 match
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालयने टेकले गुडघे! नोंदवला रणजी ट्रॉफी इतिहासातील लाजिरवाणा विक्रम
Jasprit Bumrah Wins ICC Mens Test Cricketer of The Year 2024 With Historic Performance
Jasprit Bumrah: ‘गेमचेंजर’ जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी, ICC चा ‘हा’ पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
Shreyas Iyer argues with umpires over controversial dismissal Ajinkya Rahane does interferen in Ranji Trophy 2025
Shreyas Iyer Controversy : आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली, अजिंक्य रहाणेला करावा लागला हस्तक्षेप
Ravindra Jadeja take five wicket haul for Saurashtra against Delhi in Ranji Trophy 2024-25
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत रवींद्र जडेजाची कमाल! सौराष्ट्रासाठी पाच विकेट्स घेत दिल्लीच्या डावाला पाडली खिंडार

यामध्ये शिवम मावीने आपल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. आपल्या कामगिरीबाबत तो म्हणाला की, ”जेव्हा मी मैदानात आलो, तेव्हा स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटले. गेल्या ६ वर्षांपासून मी याची वाट पाहत आहे. मी यापूर्वी दुखापतीने त्रस्त होतो.” याच कारणामुळे तो फिटनेससाठी खूप मेहनत घेत होता.

गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी त्याला विचारले की, पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करून तो काय विशेष करणार आहे. कोणाशी बोलणार? यावर मावी म्हणाला की, ”मी घरच्यांशी कॉलवर बोलून झोपणार आहे. कारण पुढचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे.”

पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट्स घेणारा मावी भारताचा तिसरा गोलंदाज –

नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याबाबत, मावी म्हणाला की, त्याची नजर विकेट घेण्यावर असते. शिवम पहिल्या सामन्यातही अशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. ४ षटकांत प्रत्येकी एक विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. याआधी बरिंदर स्रान आणि प्रग्यान ओझा यांनी भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात ४-४ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे आता अशी कामगिरी करणारा मावी भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

पाच दिवसात ३ टी-२० सामने –

भारताला श्रीलंकेविरुद्ध ५ दिवसांत ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. दुसरा सामना पुण्यात ५ जानेवारीला तर शेवटचा सामना राजकोटमध्ये ७ जानेवारीला होणार आहे. यानंतर १० ते १५ जानेवारी या सहा दिवसांत उभय संघांमध्ये ३ वनडे सामने होणार आहेत. याआधीही व्यस्त वेळापत्रकावर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Story img Loader