IND vs SL Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत आठव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव १५.२ षटकांत ५० धावांवर आटोपला. मोहम्मद सिराजने सहा विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने हा सामना ६.१ षटकांत म्हणजे अवघ्या ३७ चेंडूत जिंकला. शुबमन गिल १९ चेंडूत २७ धावा करून नाबाद राहिला आणि इशान किशन १८ चेंडूत २३ धावा करून नाबाद राहिला. फलंदाजी करताना सलामीवीरांनी विकेट टिकवून ठेवल्यामुळे संघाला मोठा विजय मिळाला. सामना संपल्यानंतर इशान किशन याने रोहितचे आभार मानले.

आशिया कप २०२३चे विजेतेपद टीम इंडियाने मिळवले. आज स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला, जो भारताने १० विकेट्सने नावावर केला. मोहम्मद सिराज भारतासाठी मॅच विनर ठरला. भारताने फलंदाजी करताना सलामीवीरांनी विकेट टिकवून ठेवल्यामुळे संघाला मोठा विजय मिळाला. सामना संपल्यानंतर इशान किशन याने कर्णधार रोहित शर्माचे आभार मानले. मात्र, त्याने आभार मानताना मोठे भाष्य केले.

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India Beat England by15 Runs and Wins T20I Series
IND vs ENG: पुण्यनगरीत टीम इंडियाने कमावलं मालिका विजयाचं पुण्य; तिसऱ्या टी२० सामन्यात विजयासह विजयी आघाडी
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा

एकदिवसीय अंतिम फेरीतील चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा विजय

भारताने कोणत्याही एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅट फायनलमध्ये शिल्लक चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आशिया कपच्या फायनलमध्ये २६३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २००३ मध्ये सिडनी येथे झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध २२६ चेंडू राखून सामना जिंकला होता.

हेही वाचा: IND vs SL, Asia Cup: मोहम्मद सिराजची ‘ती’ कृती पाहून किंग कोहलीला हसू अनावर, नेमकं असं काय घडलं? पाहा video

कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाचा नियमित सलामीवीर फलंदाज आहे पण आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात त्याने डावाची सुरुवात केली नाही. शुबमन गिल आणि त्याची साथ देण्यासाठी हिटमॅनच्या जागी डावखुरा फलंदाज इशान किशन फलंदाजीला आला. इशानने २३ आणि गिलने २७ धावा करत भारताला मिळालेले ५१ धावांचे लक्ष्य अवघ्या ६.१ षटकात गाठले. विजयानंतर स्वतः रोहितनेच आपल्याला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली, असा खुलासा इशानकडून केला गेला.

भारतीय संघाच्या इतिहासात हा आठवा आशिया चषक विजय ठरला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात हा सलग दुसरा आशिया चषक भारताने जिंकला. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर ईशान किशन म्हणाला, “जर संधी मिळाली तर मला सलामीला फलंदाजी करायला आवडेल. रोहितभाईची जर इच्छा असेल तर डावाची सुरुवात करू शकतो,” असे तो कर्णधाराला म्हणाला. तो पुढे म्हणाला, “आज फक्त ५० धावा करायच्या होत्या म्हणून मी सलामीला आलो. ५० धावा हव्या असल्यामुळे जास्त काही करता येण्यासारखे नव्हते. आम्ही खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा: Mohmmad Siraj: सहा विकेट्स घेणाऱ्या सिराजची मन जिंकणारी कृती, ग्राऊंड्समन्सना दिली ‘मॅन ऑफ द मॅच’च्या पुरस्काराची रक्कम

सामन्याचा जर एकंदरीत विचार केला तर, नाणेफेक जिंकून श्रीलंकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. हार्दिक पांड्या याने ३, मोहम्मद सिराज याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह यालाही एक विकेट मिळाली. ५१ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी टी इंडिया फलंदाजीला आल्यानंतर लंकन गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.

Story img Loader