तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा ३१७ धावांनी मोठा पराभव केला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३९१ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ ७३ धावांवर गारद झाला. त्यामुळे हा विजय एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. या ऐतिहासिक विजयासह भारताने श्रीलंकेचा मालिकेत ३-० असा धुव्वा उडवला.

मैदानावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार खेळ केला, पण या सामन्यासाठी भारतीय चाहत्यांचा उत्साह कमीच होता. सामन्यादरम्यान जवळपास अर्धे स्टेडियम रिकामे दिसले. अशा परिस्थितीत एकदिवसीय क्रिकेटकडे लोकांची आवड कमी होत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनेही एकदिवसीय क्रिकेटबद्दल चिंता व्यक्त केली.

IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
India vs England 4th T20 Highlights in Marathi
India vs England 4th T20I Highlights: हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लडला चारली धूळ
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
Hardik Pandya surpasses Bhuvneshwar Kumar to become Most balls bowled for India in T20I cricket
IND vs ENG : हार्दिक पंड्याची ऐतिहासिक कामगिरी! भुवनेश्वर कुमारला मागे टाकत केला मोठा पराक्रम
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’

युवराज सिंगने ट्विटरवर लिहिले, ”शुभमन गिल चांगला खेळला, आशा आहे कोहली शतक करेल. दुसऱ्या बाजूला फलंदाजी मजबूत दिसत आहे! मला काळजी वाटते की अर्धे स्टेडियम रिकामे आहे? वनडे क्रिकेट मरत आहे का?”

यापूर्वी, २०१८ मध्ये तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय सामना झाला होता, तेव्हा पावसाचा व्यत्यय असूनही स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. परंतु यावेळी स्थानिक प्रेक्षकांच्या गर्दी कमी असल्यामुळे ते रिकामे दिसत होते.
या स्टेडियममध्ये ३८,००० प्रेक्षकांची आसन क्षमता आहे. मात्र, रविवारी सामना पाहण्यासाठी फक्त १७,००० प्रेक्षक आले होते. ज्यामुळे अर्धे स्टेडियम रिकामे होते. केरळ क्रिकेट असोसिएशनचे मीडिया मॅनेजर कृष्णा प्रसाद यांनी याचे कारण वनडेमध्ये रस नसणे यासह अनेक कारणे सांगितले आहेत.

प्रेक्षक स्टेडियममध्ये का आले नाहीत?

कृष्णा प्रसाद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आम्ही कधीही अर्धे रिकामे स्टेडियम पाहिले नाही. याची अनेक कारणे आहेत. आता एकदिवसीय सामन्यांमधली अनेकांची आवड आम्हाला दिसत नाही. आणि वर कोलकाता मालिकेचा निकालही लागला होता, ज्यामध्ये भारताने २-० अशी अजेय आघाडी घेतली होती. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघही श्रीलंका होता, त्यामुळे बहुतेक लोक स्टेडियममध्ये आले नाहीत. तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या तिकिटांची किंमत १००० आणि २००० रुपये होती.

हेही वाचा – VIDEO: विराट आणि शुबमन गिलने आपल्या यशाचे श्रेय ‘या’ तीन सदस्यांना दिले, पाहा कोण आहेत?

गुवाहाटी वनडेतही अशीच अवस्था होती –

प्रसाद पुढे म्हणाले, ”वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यादरम्यान एकही तिकीट शिल्लक नव्हते. हा सामना पावसाने प्रभावित झाला होता आणि सामन्याची पूर्ण ५० षटकेही पूर्ण झाली नव्हती, तरीही स्टेडियम लोकांनी खचाखच भरले होते.” पाहिलं तर या संपूर्ण मालिकेत ईडन गार्डन वगळता फारच कमी प्रेक्षक सामना पाहायला आले होते. कोलकाता येथे ५५००० लोकांनी सामना पाहिला. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक गुवाहाटीला पोहोचले, पण तिथेही स्टेडियम भरलेले नव्हते. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमची क्षमता ३८,००० प्रेक्षकांची आहे, ज्यापैकी फक्त २५,००० प्रेक्षक उपस्थित होते.

हेही वाचा – IND vs SL: विराटला भेटण्यासाठी चाहता मैदानात घुसला अन्… सुरक्षा कर्मचारी आणि खेळाडू पाहतच राहिले; पाहा VIDEO

एकदिवसीय क्रिकेट खरोखरच संपत आहे का?

गेल्या वर्षी इंग्लिश क्रिकेटपटू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला, तेव्हापासून ५० षटकांच्या या फॉरमॅटबद्दल चर्चा सुरू झाली. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी द्विपक्षीय मालिका कमी करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने एकदिवसीय क्रिकेट आता पूर्णपणे बंद केले पाहिजे, असे म्हटले होते.

Story img Loader