भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी (IND vs WI 3rd T20I) चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०,००० प्रेक्षकांना प्रवेश दिला आहे. भारतीय संघाने पहिला सामना ६ विकेटने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

“तुमच्या विनंतीनंतर आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, वेस्ट इंडीजविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला”, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे प्रमुख अविशेक दालमिया यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.

What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Maharashtra Corporation Election
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली!
Thane , Eknath Shinde , Uddhav Thackeray group,
आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

हेही वाचा – IND vs WI : “दात दाखवू नकोस…”, रोहितनं पुन्हा एकदा चहलला केलं ट्रोल; पाहा VIRAL VIDEO

दालमिया म्हणाले, ”आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत. यामुळे कॅबला आजीवन सहकारी, वार्षिक आणि मानद सदस्यांप्रती आपली जबाबदारी पार पाडता येईल.” याआधी गांगुलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, खेळाडूंच्या आरोग्याला कोणताही धोका टाळण्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. दालमिया यांनी ७० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची विनंती केली होती.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेतील पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये, जवळपास २००० प्रेक्षकांना कॉर्पोरेट बॉक्स आणि डॉ. बीसी रॉय क्लबहाऊसच्या वरच्या वर्गात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Story img Loader