Reactions on Sarfaraz Khan Not Selected for West Indies Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवार, २३ जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. विंडीज कसोटी मालिकेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या सरफराज खानची निवड होईल, असे सर्वांना वाटत होते, मात्र यावेळीही निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर प्रचंड संतापले आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी शुक्रवारी (२३ जून) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. वर्ल्ड टेस्ट कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीकेला सामोरे जाणाऱ्या रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना संघातून वगळण्यात आले.

Shreyas Iyer came to bat with Sunglasses brutally trolled
Duleep Trophy 2024 : गॉगल घालून बॅटिंगला उतरला, भोपळ्यासह तंबूत परतल्याने श्रेयस अय्यर होतोय ट्रोल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
R Ashwin roasted Pakistan cricket fan for trolling Nitish Reddy
R Ashwin : नितीश कुमार रेड्डीची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला अश्विनने शिकवला चांगलाच धडा, मीम्स व्हायरल
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
jonty rhodes air india flight late over an hour and a half he is wait at mumbai airport
Jonty Rhodes : जॉन्टी ऱ्होड्सने नाराजी व्यक्त केल्यानंतर एअर इंडियाने मागितली माफी, नेमकं काय आहे प्रकण?
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
How did Indian mango reach China and Pakistan?; India and China face off over mangoes
India-China mango history:आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?

८० सरासरी, १३ शतके… विंडीज दौऱ्यासाठी अद्याप निवड नाही- सुनील गावसकर

विशेष म्हणजे यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या सरफराज खानने निराशा केली. सरफराज खानला संघात स्थान न मिळाल्याने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर संतापले. याप्रकरणी गावसकर यांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.

हेही वाचा: IND vs WI: व्यस्त वेळपत्रकामुळे वेस्ट इंडिज बोर्ड अडचणीत! WC क्वालिफायर अन् भारताविरुद्धचे सामने खेळाडूंना फोडणार घाम

“आयपीएलच्या आधारे कसोटी संघ निवडायचा असेल तर रणजी करंडक खेळणे बंद केले पाहिजे”, अशी सडकून टीका सुनील गावसकर यांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर केली. गावसकर यांनी इंडिया टुडेला सांगितले की, “सरफराज खानने गेल्या तीन हंगामात ८०च्या सरासरीने धावा केल्या असून त्यात १३ शतके झळकावली आहेत. संघात निवड होण्यासाठी त्याला अजून काय करावे लागेल? तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकणार नाही, परंतु तुम्ही त्याला किमान संघात निवडावे.”

गावसकर पुढे म्हणाले, “सरफराजला सांगितले पाहिजे की त्याच्या कामगिरीकडे लक्ष दिले जात आहे. अन्यथा रणजी करंडक खेळणे बंद करा. आपण स्पष्टपणे सांगू या की त्याचा काही उपयोग नाही, तुम्ही फक्त आयपीएल खेळता आणि त्यावरून कसोटी क्रिकेटसाठीही तुम्ही चांगले आहात असे ठरवा.”

सरफराज खानची सरासरी ८०च्या आसपास आहे

२५ वर्षीय सरफराज खानने आतापर्यंत ३७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १३ शतके आणि ९ अर्धशतकांसह ३५०५ धावा केल्या आहेत. सरफराज खानची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३०१ आहे आणि सरासरी ८० (७९.६५) आहे. या महान विक्रमानंतरही सरफराजची कसोटी संघात निवड झाली नाही, हे थोडं आश्चर्यच आहे. एकदिवसीय आणि टी२० कामगिरीच्या जोरावर ऋतुराज गायकवाडला कसोटी संघात स्थान मिळू शकले, तर देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर सरफराज खानलाही संधी मिळू शकते.

वरिष्ठ खेळाडूंबाबत ‘हे’ वक्तव्य केले

विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून वरिष्ठ खेळाडूंना आणखी थोडा ब्रेक मिळायला हवा होता, असे सुनील गावसकर यांचे मत होते. गावसकर म्हणतात, “त्यांना २०, २५ जुलैपर्यंत सुट्टी द्यायला हवी होती. आता वरवर पाहता हा संघ १ किंवा २ जुलैपासून सराव सामन्यांसाठी ते जाणार आहेत, त्यामुळे त्यांना किती दिवसांची सुट्टी मिळाली? जेमतेम २० दिवस? त्यांना ४० दिवसांचा ब्रेक का देण्यात आला नाही? नव्या मालिकेसाठी परतल्यावर ते पूर्णपणे ताजेतवाने होऊन परतले असते.

हेही वाचा: IND vs WI: “पुजारालाच का बळीचा बकरा बनवलं जातं?” सुनील गावसकरांनी संघ निवडीवरून रोहित-विराटवर साधला निशाणा

भारताचा विंडीज दौरा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद कुमार सिराज, मुकेश कुमार. जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.