Hardik Pandya, India vs West Indies: वेस्ट इंडिजमध्ये सहा वर्षांनंतर भारतीय संघाला एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने त्याचा सहा विकेट्सने पराभव केला. शनिवारी (२९ जुलै) विजयानंतर विंडीजने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदादमध्ये १ ऑगस्टला होणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील अतिप्रयोग हे टीम इंडियाच्या पराभवाचे कारण असल्याचे मानले जात आहे. या प्रयोगांवर टीका होत आहे, मात्र प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार हार्दिक यांनी त्याचा बचाव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हंगामी कर्णधार हार्दिक पांड्याने खराब फलंदाजीवर पराभवाचा ठपका ठेवला. कर्णधार हार्दिक म्हणाला, आम्ही जशी फलंदाजी करायला हवी होती तशी फलंदाजी केली नाही. पहिल्या सामन्यातील खेळपट्टीपेक्षा आजच्या सामन्यातील खेळपट्टी ही अधिक चांगली होती. यात शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आमच्या सलामीवीरांनी ज्या प्रकारे सुरुवात दिली निश्चितच चांगली होती. विशेषत: इशानने अर्धशतक करत टीम इंडियाला भक्कम पाया रचून दिला होता. मात्र, त्याचा फायदा मधल्या फळीतील फलंदाजांनी उचलला नाही. एवढे असूनही गोलंदाजीत शार्दुलने शानदार खेळी करत संघाला सामन्यात परतण्यासाठी खूप मेहनत घेतली. होप आणि कार्टीने चांगली फलंदाजी करत वेस्ट इंडीजला विजय मिळवून दिला.”

हेही वाचा: Virat Kohli: विराट पाणी पाजत राहिला तर रोहितचा पत्ताच नाही, अशी करणार वर्ल्डकपची तयारी? सोशल मीडियावर चाहत्यांचा सवाल

हार्दिक विश्वचषकासाठी तयार नाही का?

सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, “पराभवाने निराशा आहे, पण खूप काही शिकण्यासारखे होते. सलामीवीरांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, ते भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे. इशान किशनने चांगली खेळी खेळली.” आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला सलग दोन सत्रात अंतिम फेरीत पोहचावणाऱ्या कर्णधार हार्दिकने आगामी एकदिवसीय विश्वचषकाबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्याने २०२२ मध्ये गुजरातला चॅम्पियन बनवले आणि मर्यादित षटकांमध्ये भारताचा पुढील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा: IND vs WI: विश्वचषक न खेळणाऱ्या वेस्ट इंडीजकडून भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविडचे मोठे विधान; म्हणाला, “रोहित-विराटला विश्रांती…”

एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीबाबत हार्दिक म्हणाला की, “मी सध्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मला कामाचा वर्कलोड वाढवावा लागेल. अधिक षटके गोलंदाजी करावी लागेल. सध्याच्या क्षणी मी ससा नाही तर कासव आहे. मात्र विश्वचषक येईपर्यंत सारं काही सुळळीत होईल, अशी अपेक्षा आहे. विश्वचषक सुरु झाल्यावर सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे.” हार्दिकच्या या वक्तव्यामुळे तो अद्याप वर्ल्डकपसाठी पूर्णपणे तयार नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. आता अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. पुढचा सामना प्रेक्षकांसाठी खूपच रोमांचक असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi i am a tortoise and not rabbit said hardik after the defeat pandya gave clarification on kohli rohit not playing avw
Show comments