India vs Afghanistan 1st T20 Match: पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-२० मालिका खेळण्याच्या तयारीत असलेला अफगाणिस्तान संघ गेल्या काही दिवसांपासून मोहालीत सराव करत आहे. येथील घसरलेले तापमान आणि दाट धुके पाहता या कठीण परिस्थितीत सामना कसा पूर्ण होईल याची क्रिकेट चाहत्यांसह त्यांनाही चिंता सतावत असेल. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना येथील कडाक्याच्या थंडीचा फारसा फटका बसणार नाही कारण, त्यांच्या देशातही थंडीची परिस्थिती सारखीच आहे, परंतु दाट धुक्यात फ्लड लाइट्सखाली खेळणे हे सर्वात मोठे आव्हान असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहालीत कडाक्याच्या थंडीत सूर्यास्तानंतर सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी या शहरात कडाक्याच्या थंडीत अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले आहेत, परंतु हे सामने केवळ दिवसा उजेडात सूर्यप्रकाशात खेळले गेले आहेत. डिसेंबर-जानेवारी दरम्यान फ्लड लाइट्सखाली सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गुरुवारी मोहालीच्या तापमानाबद्दल जर बोलायचे झाले तर, संध्याकाळी किमान तापमान ५ ते ६ अंश राहण्याची शक्यता आहे आणि या वेळी दाट धुके आणि दव पडण्याची शक्यता देखील जास्त आहे. संपूर्ण उत्तर भारत सध्या कडाक्याच्या थंडी आणि दाट धुक्याने वेढलेला आहे. अशा परिस्थितीत येथे सामना खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे.

हेही वाचा: IND vs SA: न्यूलँड्सच्या खेळपट्टीबाबत आयसीसीने घेतला मोठा निर्णय, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड चिंतेत

सामन्यादरम्यान दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होईल आणि याचा परिणाम सामन्यावर होण्याची भीतीही अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत, खेळाडू सामना थांबवू शकतात आणि नंतर सामना रद्द देखील होऊ शकतो. कारण, एकदा धुके पडू लागले की ते वाढतच जाईल आणि नंतर सामना सुरू करण्याची परिस्थिती राहणार नाही. यामुळे दोन्ही अंपायर्स आणि सामनाधिकारी काय निर्णय घेतात, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

मोहालीच्या मैदानावर धुक्याऐवजी फक्त दव पडल्यास पंजाब क्रिकेट असोसिएशनने (पीसीए) त्याची तयारी केली आहे. येथील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या २-३ दिवसांपासून येथे फारसे धुके नाही आणि दव बद्दल जर सांगायचे तर, आम्ही सामन्याच्या दोन दिवस आधी अस्सपा (Aspa) रसायनाचा वापर सुरू केला आहे, हे दवाचा प्रभाव कमी करेल. जमीन ओली होण्यापासून प्रतिबंध करेल. ही एक चांगली गोष्ट आहे, जी यापूर्वी देखील अनेक वेळा अनेक ठिकाणी वापरली गेली आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात कशी असेल खेळपट्टी

हिवाळ्यात मोहालीच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ते वेगवान गोलंदाजांना स्विंग करण्यास मदत करते. मात्र, या मैदानावर हाय स्कोअरिंगचे सामनेही पाहायला मिळाले आहेत. खेळपट्टीवर चांगली उसळी असल्याने चेंडू बॅटवर सहज येतो. तसेच मैदानाचे आऊटफिल्डही वेगवान आहे.

हेही वाचा: IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध होणार अनेक विक्रम, कोहली-रोहित शर्मासाठी अखेरची संधी? जाणून घ्या

भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी-२० सामन्यातील हवामान अंदाज

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२०च्या दिवशी संध्याकाळी येथे खूप थंडी असेल. दिवसाचे कमाल तापमान १४ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील. या सामन्यात पावसाची शक्यता नाही. पूर्ण ४० षटकांचा सामना अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India afghanistan will play bilateral series for the first time in t20i danger of cancellation on the very first match avw
Show comments