भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने, मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी होण्याची चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे. तो नोएडा येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
“गेल्या 6-7 महिन्यांच्या काळात भारतीय संघ चांगला खेळ करतोय. हे पाहता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहेत. संघातल्या प्रत्येक खेळाडूने त्यांच्या क्षमतेला साजेसा खेळ केला आहे.” सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. 5 जूनला साऊदम्पटनच्या मैदानावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.
First published on: 22-02-2019 at 08:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India are favourites at world cup says former captain ganguly