भारतीय पुरुष संघाने ढाका येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ५-१ अशी मात करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
सामन्याची सुरुवात बांगलादेशच्या गोलने झाली. त्यांचा हा गोल सातव्या मिनिटाला हसन झुबेर याने केला. मात्र त्यानंतर हरजितसिंग याने भारताचा पहिला गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ भारताच्या युवराज वाल्मीकी (१२वे मिनिट), एस.के.उथप्पा (२०वे मिनिट), देवेंद्र वाल्मीकी (२४वे मिनिट) यांनी गोल करीत पूर्वार्धात ४-१ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात अफान युसुफने ४१व्या मिनिटाला भारताचा पाचवा गोल नोंदविला. देवेंद्र वाल्मीकी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेतील तिसरा सामना शनिवारी होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा