Asian Games 2023: २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धे २०२३मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने आपली उत्कृष्ट अशी लय कायम ठेवत ११व्या दिवशी सकाळी भारताने दोन पदके जिंकली. पहिले पदक ३५ किलोमीटर शर्यतीत आणि दुसरे पदक तिरंदाजीमध्ये होते. पहिल्या १० दिवसांत ६९ पदके जिंकणाऱ्या भारताने ११व्या दिवशी ७१चा जादुई आकडा गाठला आणि सर्व जुने विक्रम मोडीत काढले.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी कधीही आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७१ पदके जिंकली नव्हती. ज्योती सुरेखा आणि ओजस देवतळे या जोडीने मिश्र तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताला ७१वे पदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घेऊया.

Ranji Trophy 2025 Mumbai defeated Meghalaya by an innings and 456 runs
Ranji Trophy 2025 : मुंबईचा मेघालयवर दणदणीत विजय; ८ विकेट्स आणि ८४ धावांसह शार्दूल ठाकूरचे महत्त्वपूर्ण योगदान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Loksatta anvyarth Is there a sign of India China relations
अन्वयार्थ: भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणांचे संकेत?
Jasprit Bumrah Wins ICC Mens Test Cricketer of The Year 2024 With Historic Performance
Jasprit Bumrah: ‘गेमचेंजर’ जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी, ICC चा ‘हा’ पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Ranji Trophy 2025 Jammu Kashmir create history after beat Mumbai by 5 wickets in Elite group match
Ranji Trophy 2025 : जम्मू-काश्मीरने घडवला इतिहास! रोहित-यशस्वी रहाणे असतानाही मुंबईचा रणजीत दारूण पराभव
Ravindra Jadeja 12 wickets help Saurashtra beat Delhi by 10 wickets in Ranji Trophy 2025 Elite Group match
Ranji Trophy 2025 : जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्राने पंतच्या दिल्लीचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा

आशियाई क्रीडा स्पर्धा या खेळांना १९५१ मध्ये सुरू झाली. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा या दिल्ली येथे झाल्या होत्या आणि यजमान भारताने एकूण ५१ पदके जिंकली. यामध्ये १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, यानंतर भारताला ५० पदके मिळविण्यासाठी ३१ वर्षे वाट पाहावी लागली. १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १३ सुवर्णांसह ५७ पदके जिंकली होती. १९५४ मध्ये भारताने एकूण १७ पदके जिंकली आणि १९५८ मध्ये केवळ १३ पदके जिंकली होती, तर १९५१ मध्ये भारताने १५ सुवर्ण जिंकले.

असा एक प्रसंग १९९० मध्ये आला होता, जेव्हा भारत पदकतालिकेत पहिल्या १० मध्येही नव्हता. या वर्षीही भारताकडे केवळ २३ पदके होती. त्यात एकच सुवर्णपदक होते. १९९८ पासून भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आणि २००६ मध्ये प्रथमच भारताने घरापासून दूर ५० हून अधिक पदके जिंकली. तेव्हापासून भारत सतत ५० हून अधिक पदके जिंकत आहे. २०१० मध्ये, भारताने ६५ पदके जिंकली आणि सर्वाधिक पदकांचा नवा विक्रम केला. २०१८ मध्ये, भारताने यात आणखी सुधारणा केली आणि ७० पदके जिंकली. आता २०२३ मध्ये, भारताने ७१ हून अधिक पदके जिंकली आहेत आणि इतर अनेक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून पदके मिळवली आहेत. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू नवी यशोगाथा लिहिणार हे निश्चित आहे. यावेळी शंभरी पार करण्याचा नारा देत भारतीय खेळाडू हांगझाऊकडे रवाना झाले होते. अशा स्थितीत यंदा भारताच्या झोळीत १०० पदके येतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: World Cup: १२ वर्षानंतर भारत वर्ल्डकप जिंकेल का? कर्णधार रोहित शर्माचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “माझ्याकडे उत्तर नाही…”

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी
वर्षसुवर्णरौप्यकांस्यएकूण पदके
१९५१ १५१६२०५१
१९५४ १७
१९५८१३
१९६२१०१३१०३३
१९६६११२१
१९७०१०२५
१९७४१२१२२८
१९७८११११२८
१९८२१३१९२५५७
१९८६२३३७
१९९०१४२३
१९९४१६२३
१९९८१११७३५
२००२१११२१३३६
२००६१०१७२६५३
२०१०१४१७३४६५
२०१४१११०३६५७
२०१८१६२३३१७०
२०२३१६२७३१७४*

Story img Loader