India Squad Announced for IND vs BAN T20I Series: भारत आणि बांगलादेश यांच्यात ६ ऑक्टोबरपासून टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे आहे. त्याचबरोबर यावेळी नितीश कुमार रेड्डीचाही या मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. त्याचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने आयपीएलमध्ये हैदराबादसाठी चमकदार कामगिरी केली होती. याचबरोबर मयंक यादवलाही संघात संधी मिळाली आहे.

मयांक यादवला पहिल्यांदाच संधी

बांगलादेशविरूद्ध टी-२० मालिकेसाठी मयांक यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या मयंक यादवला संघात संधी मिळाली आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मयंकने ताशी १५० किलोमीटरहून अधिक वेगाने चेंडू टाकला आणि आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला. दुखापतीमुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता, पण त्याने त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

हेही वाचा – IPL 2025: BCCI चा ऐतिहासिक निर्णय, IPL मध्ये खेळाडूंना मॅच फी म्हणून मिळणार ७.०५ लाख, तर सर्व सामने खेळण्यासाठी मिळणार कोट्यवधी रूपये

वरुण चक्रवर्ती आणि जितेश शर्मा यांचं पुनरागमन

कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर म्हणून समोर आलेला वरूण चक्रवर्तीला पुन्हा एकदा बारतीय संघात स्थान मिळालं आहे. गेल्या सीझनमध्ये कोलकातासाठी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा संधी मिळवली आहे. याचबरोबर जितेश शर्माचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुसरा यष्टिरक्षक म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीने केली बुमराहची नक्कल, जडेजाने पण दिली साथ; हे पाहून जसप्रीत बुमराहने दिली अशी प्रतिक्रिया


या खेळाडूंना दिला विश्रांती

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. भारताला आगामी काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. याचबरोबर यशस्वी जैस्वाल शुबमन गिल, अक्षर पटेल, कुलदीप यादव मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनाही विश्रांती दिली आहे. पुढील कसोटी सामने लक्षात घेता या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय इशान किशनला पुन्हा संधी मिळालेली नाही. त्याने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० प्रकारातून विश्रांती घेतली आहे.

बांगलादेशविरूद्ध सामन्यात अभिषेक शर्माबरोबर सलामीला कोण उतरणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऋतुराज गायकवाडला या संघात संधी मिळाली नाही, नुकत्याच होणाऱ्या इराणी कपसाठी रेस्ट ऑफ इंडिया संघाचा कर्णधारही आहे.

हेही वाचा – Musheer Khan Health Update: मुशीर खानचा अपघातही ऋषभ पंतप्रमाणेच, अधिकृत माहिती आली समोर, मानेला फ्रॅक्चर असून मुंबईत होणार पुढील उपचार

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयांक यादव.