पीटीआय मुंबई
मायदेशात प्रथमच भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व करताना विजयी सलामीसाठी हार्दिक पंडय़ा उत्सुक असून मंगळवारी त्याच्या युवा संघापुढे श्रीलंकेचे आव्हान असेल. तीन सामन्यांच्या या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताचे युवा खेळाडू या मालिकेत कशी कामगिरी करतात याकडे सर्वाचे लक्ष असेल.
या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने भारतीय संघाने सध्या ट्वेन्टी-२० क्रिकेटला प्राधान्य दिलेले नाही. मात्र, २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने हार्दिकसाठी ही मालिका महत्त्वाची ठरू शकेल. त्याच्याकडे भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचा पुढील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. त्याने ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात प्रथमच नेतृत्वाची धुरा सांभाळताना गुजरात टायटन्स संघाला जेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर गेल्या वर्षी हार्दिकने आर्यलड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत यशस्वी कामगिरी केल्यास हार्दिक कर्णधारपदासाठी आपली दावेदारी अधिक भक्कम करेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा