कोलंबो : पहिल्या दोन सामन्यांतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर मालिकेत पिछाडीवर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला आज, बुधवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजय अनिवार्य आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ तब्बल २७ वर्षांनी भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताची ही पहिली एकदिवसीय मालिका आहे. त्यामुळे या नव्या पर्वाची किमान बरोबरीने सुरुवात करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारताने श्रीलंकेविरुद्ध अखेरची एकदिवसीय मालिका १९९७ मध्ये गमावली होती. अर्जुना रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने सचिन तेंडुलकरच्या भारतीय संघाला ०-३ असे नमवले होते. त्यानंतर उभय संघांत ११ एकदिवसीय मालिका झाल्या आणि प्रत्येक वेळी भारतीय संघच विजेता ठरला. सध्या सुरू असलेल्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताला ३२ धावांनी पराभूत व्हावे लागले होते.

England vs India match Cricket bookies active for betting Nagpur news
इंग्लंड विरुद्ध भारत : सट्टेबाजीसाठी क्रिकेट बुकी सक्रिय; दोन हजार कोटींपेक्षा जास्त…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG ODI Series Full Schedule Timings and Squads in Detail India England
IND vs ENG: भारत वि इंग्लंड वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक वाचा एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
Harshit Rana became the first indian to make his T20I debut as a concussion substitute in IND vs ENG
Harshit Rana : हर्षित राणाने घडवला इतिहास! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट

हेही वाचा >>> Paris Olympics 2024: विनेश फोगटने अंतिम फेरीत धडक मारत घडवला इतिहास; ही कामगिरी करणारी ठरली पहिली महिला कुस्तीपटू

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा भारतीय संघाला फटका बसला आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमच्या खेळपट्टीकडून फिरकीपटूंना चांगली मदत मिळत आहे आणि याचा श्रीलंकेने पुरेपूर फायदा घेतला आहे. कर्णधार रोहित शर्माचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना फिरकीचा सामना करताना बऱ्याच अडचणी येत आहेत. तारांकित फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत दोन सामन्यांत केवळ ३८ धावा केल्या आहेत. फिरकीपटूंसमोर तो चाचपडताना दिसत आहे. त्यामुळे फलंदाजीत अधिक आक्रमकता आणत श्रीलंकेच्या फिरकीपटूंवर दडपण आणण्याचा कोहलीचा प्रयत्न असेल. फिरकीपटूंविरुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवम दुबेला गेल्या सामन्यात जेफ्री वांडरसेने निष्प्रभ केले.

श्रेयस, राहुलची चिंता

मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या कामगिरीची भारताला चिंता असेल. या दोघांनाही श्रीलंकेच्या फिरकीपटूंविरुद्ध खेळताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राहुलला गेल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. श्रेयसला दोन सामन्यांत मिळून ३० धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे दोघांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. तसेच फलंदाजी भक्कम करण्याच्या दृष्टीने शिवम दुबेच्या जागी रियान परागला संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल. तो उपयुक्त फिरकी गोलंदाजही आहे. फलंदाजासाठी भारताकडे ऋषभ पंतचा पर्यायही आहे.

Story img Loader