IND vs BAN Men’s T20 Match Live Score Today : भारत आणि बांगलादेश तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आमनेसामने आहेत. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या टी-२० सामना जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा एकतर्फी पराभव केल्याने बांगलादेशला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
India vs Bangladesh 2nd T20 Match Live Score, 09 October 2024 : भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत १५ टी-२० सामने झाले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने १४ आणि बांगलादेशने एक सामना जिंकला आहे. अशा प्रकारे टीम इंडियाचे बांगलादेशवर टी-२० मध्ये वर्चस्व आहे.
नितीश रेड्डी यांनी चौकार-षटकार मारला
नितीश रेड्डीने 9व्या षटकात महमुदुल्लाला एक षटकार आणि एक चौकार लगावला. 9 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 77 धावा आहे. या षटकात एकूण 15 धावा आल्या. नितीश रेड्डी 16 चेंडूत 23, तर रिंकू सिंग 11 चेंडूत 17 धावांवर खेळत आहे.
7 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा आहे. नितीश रेड्डी 9 चेंडूत 10 धावांवर खेळत आहे. त्याने चौकार मारला आहे. तर रिंकू सिंग पाच चेंडूत सहा धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकारही मारला आहे.
https://twitter.com/I_am_Unkar007/status/1844016291532951762
भारताची टॉप ऑर्डर ढासळली आहे. सलामीची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर आता कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदान सोडले आहे. संघाने केवळ 41 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत.
भारताला दुसरा धक्का बसला
तिसऱ्या षटकात भारताला दुसरा मोठा धक्का बसला आहे. अभिषेक शर्माला तनझिम हसनने आपला शिकार बनवले आहे. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्माची विकेट गेली. अभिषेकने 11 चेंडूत 15 धावा केल्या.
https://twitter.com/EnPeyarDinesh/status/1844012765649981509
भारताला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला. तस्किन अहमदने संजू सॅमसनला आपला शिकार बनवले आहे. संजूने 10 धावांचे योगदान दिले.
https://twitter.com/Deepakjain1827/status/1844011013697605788
सॅमसनने पहिल्याच षटकात दोन चौकार मारले
संजू सॅमसन सलामीवीर म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. सॅमसनने पहिल्याच षटकात दोन चौकार मारले. तो चार चेंडूत 9 धावांवर आहे. तर अभिषेक शर्मा दोन चेंडूत सहा धावांवर खेळत आहे. एका षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या एकही विकेट न पडता 15 धावा आहे.
https://twitter.com/Ankitchaprana6/status/1844003871536107535
बांगलादेश संघात एक बदल
बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो याने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी बांगलादेशने संघात एक बदल केला आहे. पाहुण्या संघात शौरीफुल इस्लामच्या जागी शकीबचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक दरम्यान सांगितले की, भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
https://twitter.com/BCCI/status/1844001360205013409
बांगलादेश : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हरदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान.
बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हर्षित राणा पदार्पण करणार?
मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांनी ग्वाल्हेरमध्ये भारतीय टी-२० संघात पदार्पण केले होते. आता असे मानले जात आहे की आणखी वेगवान गोलंदाज दुसऱ्या टी-२० मध्येही पदार्पण करू शकतो. हर्षित राणा त्याच्या घरच्या मैदानावर भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकतो. आता प्रश्न असा येतो की हर्षित राणाच्या पदार्पणासाठी कोणत्या खेळाडूला वगळले जाईल? यामध्ये पहिले नाव समोर येत आहे ते म्हणजे नितीश कुमार रेड्डी. तो फक्त एकच सामना खेळला आहे, पण संघ व्यवस्थापन त्याला हर्षितसाठी बाहेर ठेऊ शकते. त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर रियान पराग फलंदाजी करू शकतो. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
दिल्लीच्या खेळपट्टीचा अहवाल
इतिहास साक्षी आहे की अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी बहुतांशी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या मैदानाच्या सीमारेषा लहान असल्याने चौकार-षटकार मारणे सोपे जाते. आयपीएल २०२४ मध्ये, या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी ८ डावांमध्ये २०० किंवा त्याहून अधिक धावा झाल्या आहेत. दुसरीकडे, जसजसा सामना पुढे सरकतो, तसतशी फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळू लागते. आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १३९ धावांची आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला १३ सामन्यांत केवळ ४ वेळा विजय मिळवता आला आहे.
बांगलादेशला आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल
भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदर देखील आहे जो रवींद्र जडेजाच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या फॉरमॅटमध्ये अष्टपैलू खेळाडूसाठी आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशचा विचार करता, मालिका जिवंत ठेवायची असेल तर त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. या सामन्याची नाणेफेक साडेसहाला होणार असून सामनाला सुरु होईल.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार का?
पहिल्या सामन्यात सहज विजयाची नोंद करणाऱ्या भारतीय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांनी पहिला सामना खेळताना ग्वाल्हेरमध्ये आपला प्रभाव सोडला होता. अर्शदीप सिंगने वेगवान गोलंदाजीची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली तर फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने तीन वर्षांनंतर यशस्वी पुनरागमन केले.