India vs Ireland, 2nd Match Updates: भारताने आयर्लंडचा 33 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका जिंकली. भारतीय संघाने टी-२० मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ केवळ १५२ धावा करू शकला आणि सामना गमावला.