India vs Zimbabwe T20I Series: टी-२० वर्ल्डकपनंतर लगेचच होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ हरारेला रवाना झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ जून रोजी होणार आहे. मात्र, यादरम्यान बीसीसीआयकडून संघात बदल करण्यात आले आहेत. झिम्बाब्वे मालिकेसाठी भारताने वर्ल्डकप सुरू असतानाच संघ जाहीर केला होता. पण आता या संघात तीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. ज्याचे कर्णधारपद शुबमन गिलकडे देण्यात आले होते. दरम्यान, या मालिकेसाठी टी-२० विश्वचषकातील संघामधील एकूण ५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पण भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्येच अडकला असल्याने भारतात परतलेला नाही. त्यामुळे संघात अचानक बदल करणे भाग पडले आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

पहिल्या दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हे खेळाडू संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांची जागा घेतील.वर्ल्डकप संघाबरोबर असलेले हे तीन खेळाडू प्रथम संपूर्ण संघासह भारतात येतील आणि त्यानंतर मालिका खेळण्यासाठी हरारेला रवाना होतील.

हेही वाचा – VIDEO: भारत विश्वविजेता झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, ट्रॉफी घेऊन शूट करताना म्हणाला; “वाटतंय प्रत्यक्षात काही…”

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा.