Ind and Aus Team fined match fee for slow over rate: लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलिया हा आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ ठरला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाबरोबरच ऑस्ट्रेलियाला एक मोठा धक्का बसला आहे. डब्ल्यूटीसी फायनलमधील दोन्ही संघांना आयसीसीने दंड ठोठावाला आहे. याबात आयसीसीने ट्विट करुन माहिती दिली.

या सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप फ्लॉप ठरली. फायनलमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी भारताला संपूर्ण मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला मॅच फीच्या ८० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. टीम इंडिया निर्धारित वेळेपेक्षा 5 षटके मागे होती. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित वेळेपेक्षा ४ षटके मागे होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही याचा फटका बसला आहे. आयसीसीने शुबमन गिलला दंडही ठोठावला आहे. त्याला मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी स्वत:ला बाद देण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्या शुबमन गिललाही दंड केला.

India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IND vs ENG Nitish Reddy Ruled out of England Series Rinku Singh Injured
IND vs ENG: भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा धक्का, दोन खेळाडू संघाबाहेर; BCCI ने जाहीर केला सुधारित संघ
Ranji Trophy 2025 Yashasvi Jaiswal Shreyas Iyer Shivam Dube flop in Mumbai vs Jammu Kashmir match
Ranji Trophy 2025 : यशस्वी-श्रेयस आणि शिवम दुबे सलग दुसऱ्या डावात अपयशी, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांपुढे टेकले गुडघे

भारताचा सलामीवीर शुबमन गिल अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात केवळ १३ धावा करून बाद झाला. रोहित १५ धावा करून आणि पुजारा १४ धावा करून बाद झाला. कोहलीही १४ धावा करून बाद झाला. श्रीकर भरतने ३१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात गिल १८ धावा करून बाद झाला. पुजारा २७ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाला खातेही उघडता आले नाही. या सामन्याच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलचे बाद होणे वादग्रस्त ठरले. त्याच्या पकडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

हेही वाचा – WTC Final 2023: पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! आयसीसीने ठोठावला दंड, काय आहे कारण? जाणून घ्या

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला. टीम इंडियाच्या पराभवासाठी खराब फलंदाजी कारणीभूत ठरली.

Story img Loader