मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘प्रभावी खेळाडू’च्या (इम्पॅक्ट प्लेयर) नियमामुळे प्रत्येक संघाला एका अतिरिक्त भारतीय खेळाडूला संधी देता येत आहे, जी नक्कीच चांगली बाब आहे. मात्र, या नियमामुळे प्रत्येक संघाला १२ खेळाडूंनी खेळता येते. परंतु माझ्या मते, क्रिकेटची खरी मजा ही ११ खेळाडूंनी खेळण्यातच आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माने व्यक्त केली.

‘आयपीएल’मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रभावी खेळाडूच्या नियमाबाबत गेल्या काही काळापासून बरीच चर्चा केली जात आहे. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले होते. विराट कोहलीही रोहितशी समहत होता. या नियमामुळे बॅट आणि बॉल यातील समतोल बिघडला असून गोलंदाज पूर्णपणे हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे, असे कोहली ‘आयपीएल’दरम्यान म्हणाला होता. तसेच ‘आयपीएल’मध्ये पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जितेशनेही ११ खेळाडूंनी खेळण्यासच आपली पसंती असेल, असे म्हटले आहे.

Border Gavaskar Trophy Sanjay Manjrekar statement on Virat Rohit
विराट-रोहितचा काळ गेला, आता ‘हा’ खेळाडू भारताचा सर्वोत्तम खेळाडू; Border Gavaskar Trophy पूर्वी संजय मांजरेकरांचं वक्तव्य
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
MS Dhoni new look photo viral
MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल
former cricketer Wasim Jaffer
रणजीपाठोपाठ इराणी जेतेपदाने मुंबईचे वर्चस्व अधोरेखित! १९९७च्या विजेत्या संघातील सदस्य वसिम जाफरचे मत
India vs Bangladesh 1st T20I
युवा खेळाडूंच्या कौशल्याचा कस; भारत-बांगलादेश पहिली ट्वेन्टी२० लढत आज
chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता | Approval to retain six players in IPL sport news
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील

हेही वाचा >>> T20 WC 2024: हिरी हिरी, चाड सोपर, असद्दोला वाला – ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळणारी कोण ही मंडळी?

‘‘प्रभावी खेळाडूच्या नियमाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. यातील पहिला दृष्टिकोन म्हणजे या नियमामुळे आता ‘आयपीएल’मधील प्रत्येक संघाला एका अतिरिक्त भारतीय खेळाडूला संधी देता येत आहे. या खेळाडूची प्रतिभा जगासमोर येते. या संधीमुळे खेळाडूचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तसेच दुसरा दृष्टिकोन म्हणजे, या नियमामुळे गोलंदाजांवरील ताण वाढला आहे. त्यांचे काम खूपच अवघड झाले आहे,’’ असे मत जितेशने व्यक्त केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी प्रभावी खेळाडूचा नियम हा प्रयोगिक तत्त्वावर असून याबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो असे म्हटले होते. हा नियम पुढील हंगामातही कायम राहिला पाहिजे का, असे विचारले असता जितेश म्हणाला, ‘‘क्रिकेटची खरी मजा ११ खेळाडूंनी खेळण्यातच आहे. तुमचे काही निर्णय चुकतात. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर तुम्ही चार वेगवान गोलंदाज खेळवता आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. फलंदाज म्हणून तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाची रचना पाहून योजना आखता येते. समोरच्या संघात चारच प्रमुख गोलंदाज असल्यास पाचव्या गोलंदाजाला तुम्हाला लक्ष्य करता येते. मात्र, प्रभावी खेळाडूच्या नियमामुळे तुम्हाला अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवता येतो. यामुळे सामन्यांतील मजा काही प्रमाणात कमी झाली आहे, असे माझे मत आहे.’’