बांगलादेश येथे पुढील वर्षी होणाऱ्या १९-वर्षांखालील (युवा) विश्वचषक स्पध्रेत भारताला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. २७ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार आहे. २८ जानेवारीला मिरपूर येथील सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.
बांगलादेशातील आठ विविध स्टेडियममध्ये स्पध्रेतील एकूण ४८ सामने खेळविण्यात येणार आहेत. भारताने २०००, २००८ आणि २०१२ मध्ये विश्वचषक उंचावला होता. यंदा त्यांना ‘ड’ गटात स्थान देण्यात आले असून गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि नेपाळ यांचा समावेश आहे. या स्पध्रेचा सलामीचा सामना यजमान बांगलादेश आणि गतविजेत्या दक्षिण आफ्रिका यांच्यात चितगांव येथील जोहर अहमद चौधरी स्टेडियमवर होईल. १६ संघांचा समावेश असलेल्या या स्पध्रेत चार गट पाडण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा