India vs Australia ICC Women’s T20 World Cup 2024 Live Match Updates : महिला टी-२० विश्वचषक २०२४ आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. आता अखेरचे गट सामने बाकी असून उपांत्य फेरीसाठी संघ निश्चित होणार आहेत. तत्पूर्वी या स्पर्धेच्या १८ व्या सामन्यात शारजाह येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्यात विजय मिळवणे भारतीय संघासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली आहे, तर भारताला ही फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्याचबरोबर नेट रन रेट चांगले असणे गरजेचे आहे.त्यामुळे आजचा सामना हमरनप्रीत कौरच्या संघासाठी ‘करो या मरो’ स्वरुपाचा आहे.
India Women vs Australia Women Live Score Update : ऑस्ट्रेलियाचे आव्हान भारतासाठी सोपे असणार नाही, पण ॲलिस हीलीच्या नेतृत्वाखालील संघ दुखापतींशी झुंजत आहे, ज्याचा फायदा भारतीय संघ घेऊ शकतो.
ऑस्ट्रेलियन संघासाठी बेथ मुनी आणि ग्रेस हॅरिस सलामी देत आहेत
भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी बेथ मुनी आणि ग्रेस हॅरिस ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. रेणुका सिंग भारतीय संघासाठी डावातील पहिले षटक टाकत आहे.
https://twitter.com/RajasthaniJayka/status/1845466616685002758
भारत: शफाली वर्मा, स्मृति मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णघार), जेमिमा रोड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, श्रेयंका पाटिल, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
https://twitter.com/ICC/status/1845459487424987471
ऑस्ट्रेलिया : बेथ मूनी (यष्टीरक्षक), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेरेहम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिली दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. तिच्या जागी ताहिला मॅकग्रा संघाचे नेतृत्व करत आहे.
भारताविरूद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची खेळाडू टायला व्लामिनेक ही दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेबाहेर झाली आहे. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या इव्हेंट तांत्रिक समितीने ऑस्ट्रेलियन संघात टायला व्लेमिनेकच्या जागी अष्टपैलू हीदर ग्रॅहमचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच आगामी सामन्यांमध्ये टायला व्लेमिनेकची जागा हीदर ग्रॅहम घेईल. वेगवान गोलंदाज व्लामिनेकला शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या गट टप्प्यातील सामन्यात दुखापत झाली होती. पाकिस्तानच्या डावातील पहिले षटक क्षेत्ररक्षण करताना तिच्या खांद्याला दुखापत झाली.
भारतीय महिला संघ रविवारी T20 विश्वचषक स्पर्धेत अनेकवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारतासाठी हा करा किंवा मरो असा सामना असेल ज्यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला मोठा विजय नोंदवावा लागेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने मोहिमेची सुरुवात केली होती, परंतु पुढील दोन सामने जिंकून बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या शक्यता बळकट केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाचे आव्हान भारतासाठी सोपे जाणार नाही, पण ॲलिस हिलीच्या नेतृत्वाखालील संघ दुखापतींशी झुंजत आहे, ज्याचा फायदा भारतीय संघ घेऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात भारतासमोर सर्वात मोठे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचे असेल. भारतीय संघाच्या फलंदाजांना विशेषत: आघाडीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारताच्या फलंदाजीच्या क्रमवारीत शफाली, हरमनप्रीत, स्मृती मानधना, जेमिमा यांचा समावेश आहे, जर त्यांनी धावा काढल्या तर कांगारू संघाला खडतर स्पर्धेला सामोरे जावे लागेल.
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ जिंकल्यास काय होईल?
दोन्ही संघांनी प्रथम फलंदाजी केल्यास न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयाच्या फरकाने किमान १७ ते १८ धावांनी विजय मिळवावा लागेल. हे समीकरण गुणांवर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, जर भारताने ऑस्ट्रेलियाला १० धावांनी हरवले तर न्यूझीलंडला किमान २७ ते २८ धावांनी पाकिस्तानला हरवावे लागेल.
मात्र, ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागल्यास ते बाहेर पडण्याची शक्यता फारच कमी आहे. भारताने १५० धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ६१ किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव केल्यास, ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट भारतापेक्षा खाली जाईल. जर भारताने ६१ धावांनी विजय मिळवला. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला पाकिस्तानचा ७७ किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव करावा लागेल. लक्ष्याचा पाठलाग केल्यास त्याला किमान ५८ चेंडू शिल्लक असताना जिंकावे लागेल.
भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण काय?
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आपले सामने जिंकल्यास या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाचेही ६ गुण असतील. सर्वोत्तम नेट रनरेट असलेले दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पराभूत झाल्यास पाकिस्तानही उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तानमधील सर्वोत्तम नेट रन रेट असलेला संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. भारत किंवा न्यूझीलंड यापैकी एकाने अंतिम सामना गमावला तर जो संघ विजयी होईल तो संघ सहा गुणांसह ऑस्ट्रेलियासह उपांत्य फेरीत धडक मारेल.