वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेपूर्वी ‘अ’ संघाविरुद्धचा तीनदिवसीय सामना रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. खेळाडू अधिक वेळ नेट सरावाला देण्यास इच्छुक असल्याने हा सराव सामना रद्द करण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवल्याचे समजते.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. भारतीय संघ १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत पर्थमध्येच ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार होता. भारत ‘अ’ संघ सध्या ऑस्ट्रेलियातच असून यजमान देशाच्या ‘अ’ संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.

Ravichandran Ashwin broke Anil Kumble records during IND vs NZ 3rd Test
Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनची वानखेडेवर कमाल! अनिल कुंबळेला मागे टाकत केला खास पराक्रम
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि काही वरिष्ठ खेळाडूंना नेटमधील सरावासाठी अधिक वेळ द्यायचा असल्याचे समजते. रोहित शर्माचा संघ न्यूझीलंडकडून झालेल्या मालिका पराभवानंतर ऑस्ट्रेलियात जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सलग तिसरी कसोटी मालिका जिंकण्याचे ध्येय बाळगलेल्या भारतीय संघावर यावेळी अतिरिक्त दडपण असणार आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक राखण्यासह जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळवण्याचे भारतासमोर आव्हान आहे.

Story img Loader