ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघची निवड करण्यात आली आहे. दोन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघामध्ये बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेल्या के.एल राहुलाल भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. विश्वचषकासाठी केएल राहुलला तिसरा सलामीवीर म्हणून पडतळण्याची ही अखेरची संधी आहे. तर फिरकीपटू रविंद्र जाडेजा, खलील अहमद, सिराज यांना डच्चू देण्यात आला आहे. उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल यांना संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यातून दिनेश कार्तिकला वगळण्यात आले आहे. विजय शंकर आणि पंतला टी-२० आणि एकदविसीय सामन्यात संधी दिली आहे. दोन टी-२० आणि पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरला आराम देण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा