कपडे धुण्याच्या धोक्याने खेळण्यापासून ते आज 'भारताचा ख्रिस गेल' अशी ओळख मिळवणाऱ्या खेळाडूचा प्रवास आज आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)आयपीएल २०२१ मध्ये महिपाल लोमरोरने पहिल्याच संघीचं सोनं केल्याचं पहायला मिळालं.राजस्थान रॉयल्सच्या या २१ वर्षीय खेळाडूने १७ चेंडूंमध्ये ४३ धावांची जबरदस्त खेळी केली.आपल्या खेळीमध्ये महिपालने चार षटकार आणि दोन चौकार लगावले.हे पाहा महिपालच्या फटकेबाजीचं वॅगनवील.पंजाबविरुद्धच्या सामन्यातील या चार षटकारांसाठी त्याला सोमवारी विशेष पुरस्कारही मिळाला.महिपाल हा एक अष्टपैलू खेळाडू आहे.१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला तेव्हा महिपाल त्यात महत्वाचा खेळाडू होता.भारतीय संघाचं भवितव्य म्हणून ज्या मोजक्या खेळाडूंकडे पाहिलं जात त्यामध्ये महिपालचंही नाव आहे.राजस्थानकडून खेळणारा महिपाल हा राजस्थानमधील नागौर येथील रहिवाशी आहे.मोठं होऊन क्रिकेटर बनायचं हे महिपालचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं.महिपालची आजी सिणागारी देवी यांनी एका मुलाखतीमध्ये महिपालच्या लहानपणीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला होता.लहानपणी महिपाल क्रिकेट खेळण्याचा हक्क करु लागला आणि त्यानंतर तो कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोक्याने क्रिकेट खेळू लागला, असं त्यांची आजी सांगते.महिपालचा हट्ट पाहून त्याला अखेर एक बॅट विकत घेऊन दिली असंही आजींनी सांगितलं होतं.बॅट मिळाल्यानंतर घरासमोरच्या गल्लीलाच महिपालने आपल्या सरावाचं मैदान करुन तिथे तो क्रिकेट खेळू लागला. त्याला त्याची मोठी बहीण गोलंदाजी करायची, असं या आजींनी सांगितलं.घरासमोरच्या गल्लीतून सुरु झालेला महिपालचा प्रवास आज आयपीएलपर्यंत येऊन पोहचलाय.महिपालने अगदी लहान वयामध्येच आपलं घर सोडलं.महिपालच्या वडिलांनी त्याला वयाच्या ११ व्या वर्षीच नागौरमधून जयपूरला पाठवलं.महिपालच्या वडिलांचा त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाला पाठिंबा होता. महिपालच्या वडिलांचा त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाला पाठिंबा होता. त्यामुळेच नागौरमध्ये क्रिकेटसंदर्भातील सुविधा चांगल्या नसल्याने त्याला जयपूरला पाठवण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला.विशेष म्हणजे महिपालची देखभाल करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी आजीसुद्धा त्याच्यासोबत जयपूरला शिफ्ट झाली.महिपाल हा त्याच्या ओळखीच्या लोकांमध्ये ज्युनियर ख्रिस गेल म्हणून लोकप्रिय आहे.महिपाल हा अगदी सहज चेंडू टोलवतो आणि फार लांब पर्यंत फटके मारण्यामध्ये तो फार माहीर आहे.महिपाल हा डावखुरा फिरकी गोलंदाजही आहे.१४ वर्षांखालील वेरॉक शील्डच्या अंतिम सामन्यामध्ये महिपालने २५० धावा केल्या होत्या.या खेळीनंतर भारताचे माजी विकेटकीपर फलंदाज चंद्रकांत पंडित यांनीच महिपालला भारतीय ख्रिस गेल असं नाव दिलं होतं.राजस्थानच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील संघामध्ये महिपाल आणि ऋषभ पंत एकत्र खेळायचे. दोघांच्या जोडीला 'जय विरु'ची जोडी असं म्हटलं जायचं. दोघे बराच काळ एकत्र क्रिकेट खेळले आहेत.नंतर पंत दिल्लीला गेला आणि महिपाल मात्र राजस्थानमध्येच राहिला.१९ व्या वर्षी महिपाल हा राजस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार झाला.महिपाल हा फलंदाजांमध्ये गिलक्रिस्टला आदर्श मानतो.तर गोलंदाजीमध्ये महिपालचा आदर्श आहे, रवींद्र जडेजा.वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत महिपाल राजस्थानसाठी ३३ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळला आहे.महिपालने या ३३ सामन्यांमध्ये ३९ च्या सरासरीने १९५३ धावा केल्यात.अ दर्जाच्या सामन्यांमध्ये महिपालची सरासरी ४२ इतकी आहे.आयपीएलमध्ये आधी महिपालला दिल्लीच्या संघाने विकत घेतलं होतं. मात्र त्याला प्रत्यक्षात सामना खेळ्याची संधी मिळाली नव्हती.त्यानंतर महिपालला राजस्थानच्या संघाने विकत घेतलं.महिपालने राजस्थानकडून खेळताना आयपीएलमध्ये १३७ च्या सरासरीने १३० धावा केल्यात.क्रिकेटबरोबरच महिपाल हा सोशल नेटवर्किंगवर फार सक्रिय आहे.महिपाल सोशल नेटवर्किंगवर स्वत:चे बरेच फोटो पोस्ट करत असतो.कधी प्रॅक्टीस सेशनमधील मजा-मस्तीचे फोटो तो पोस्ट करतो. तर कधी जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो तो पोस्ट करत असतो.महिपालला व्यायामाची फार आवड आहे.त्याच्या जीममधील फोटोंना हजारोच्या संख्येने लाइक्स असतात.आता दुसऱ्या पर्वातील या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केल्याने महिपालकडून अपेक्षा वाढल्या आहेत.त्यामुळे आता महिपाल पुढील स्पर्धा कसा खेळतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे. महिपालसाठी राजस्थानने यंदाच्या हंगामामध्ये २० लाख रुपये मोजले आहेत.लवकरच हा तरुण खेळाडू भारताच्या मुख्य संघात दिसेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांनाही आहे.