इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आज गुरुवारी (२४ फेब्रुवारी) आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याआधी स्पर्धेचा उद्घाटन सामना २७ मार्च रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत होते, परंतु बीसीसीआयने ब्रॉडकास्टरच्या मागणीनुसार २६ मार्च ही तारीख निश्चित केली.

आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी क्रिकबझशी केलेल्या संभाषणात खुलासा केला, की ही स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. यावेळी रिकाम्या स्टेडियममध्ये सामने होणार नाहीत. म्हणजेच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. साखळी फेरीदरम्यान त्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार घेतला जाईल. स्टेडियममध्ये किमान २५ किंवा ५० टक्के प्रेक्षक उपस्थित असतील.

Inquiry , Beed District Planning Committee, Beed ,
बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी, दोन वर्षांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Devendra Fadnavis On Sarpanch Santosh Deshmukh Case
Budget 2025: ‘भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक
Union Budget 2025 Stock Market Trend
Budget 2025: अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण
Budget 2025 News
Budget 2025 : निर्मला सीतारमण सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, ‘या’ सात घोषणांची शक्यता!
Union Budget 2025 nirmala sitharaman sensex
Union Budget 2025 Highlights : “देशावर ६० वर्षे राज्य करूनही, काँग्रेस ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर सवलत…”, काँग्रेसच्या टीकेवर भाजपाचा पलटवार
Mahakumbh , Prayagraj , Railway, Plane,
प्रयागसाठी ‘प्रयाण’ सुरूच! हवाई, रेल्वे, खासगी वाहनांचे आरक्षण फुल्ल
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा

व्हर्च्युअल बैठकीत गव्हर्निंग काऊन्सिलने आयपीएलची लीग फेरी महाराष्ट्रात होणार असल्याची पुष्टी केली आहे. मुंबईत ५५ आणि पुण्यात १५ सामने होणार आहेत. लीगचे सर्व सामने चार स्टेडियममध्ये खेळवले जातील. वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर २० सामने, ब्रेबॉर्न स्टेडियमवर १५ सामने आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर १५ सामने होणार आहेत. प्लेऑफचे सामने अहमदाबादमध्ये होऊ शकतात, परंतु अंतिम निर्णय झालेला नाही.

हेही वाचा – IND vs SL : रोहित शर्मानं रचला वर्ल्ड रेकॉर्ड..! टी-२० क्रिकेटमध्ये हिटमॅन ठरला नवा किंग

बीसीसीआयने सरावासाठी चार मैदाने निवडली आहेत. यावर गव्हर्निंग काऊन्सिल बराच काळ विचार करत होती. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी मैदान, दक्षिण मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदान आणि कांदिवली किंवा ठाण्यातील एमसीए मैदानावर संघ सराव करू शकतात. यासाठी सर्व संघांना ठराविक कालावधी देण्यात येणार आहे.

Story img Loader