जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) कर्णधारपद का सोडले, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराटने भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. तत्पूर्वी त्याने मागील वर्षी आरसीबीचा कॅप्टन म्हणून शेवटचा आयपीएल हंगाम खेळला होता. नंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि त्याने स्वत: दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडले.

विराट कोहली ‘द आरसीबी पॉडकास्ट’मध्ये म्हणाला, “मी अशा लोकांपैकी नाही, ज्यांना गोष्टी रोखून ठेवायच्या आहेत. पण जर मला या प्रक्रियेचा आनंद घेता येत नसेल, तर मी ते काम करणार नाही. जेव्हा एखादा खेळाडू असा निर्णय घेतो, तेव्हा त्याच्या मनात काय होते हे समजणे लोकांना कठीण जाते. मला माझ्यासाठीही वेळ हवा होता आणि मला कामाचा भार संतुलित करायचा होता. बस.. मुद्दा इथेच संपतो.”

Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ranji Trophy 2025 fan entered at Arun Jaitley Stadium ground to meet Virat Kohli during Delhi vs Railway match
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा, VIDEO होतोय व्हायरल
Bhokardan , Raosaheb Danve,
‘माजी’ झाल्याने फरक पडत नाही, फक्त नाव पुरेसे, माजी खासदार रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
ICC CEO Geoff Allardice to step down ahead of Champions Trophy 2025
ICC CEO Geoff Allardice : पाकिस्तानातील मैदानांच्या तयारीचा घोळ भोवला? सीईओ ज्योफ एलार्डिस यांनी दिला तडकाफडकी राजीनामा
IND vs ENG Aakash Chopra Warns Abhishek Sharma Of Last Chance against England T20Is Series
IND vs ENG : ‘अभिषेक शर्माला शेवटची संधी…’, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी माजी भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य
Champions Trophy 2025 Yuzvendra Chahal has been closed says Aakash Chopra by BCCI Team Management
Champions Trophy 2025 : “युझवेंद्र चहलची फाईल बंद केली आहे…”, माजी खेळाडूचा बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनावर आरोप
Why Shreyas Iyer and KKR Parted Aways Despite Winning Title in His Captaincy
Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आणि KKR यांची का झाली ताटातूट? जेतेपद पटकावल्यानंतरही का केलं नाही रिटेन?

हेही वाचा – दारू, जुगार आणि तंबाखूचं सचिन तेंडुलकर करतोय समर्थन? वाचा काय म्हणाला क्रिकेटचा देव

आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून आरसीबीने कधीही लीगचे विजेतेपद जिंकलेले नाही. फ्रेंचायझीचे कर्णधारपद सोडण्याबाबतच्या विविध चर्चांना पूर्णविराम देत कोहली म्हणाला, “वास्तवात असे काहीही नव्हते. मी माझे जीवन अतिशय साधेपणाने जगतो. जेव्हा मला निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा मी तसे करतो आणि नंतर जाहीर करतो. मला याबद्दल विचार करायचा नव्हता आणि आणखी एक वर्ष त्याबद्दल विचार करायचा नव्हता. माझ्यासाठी जीवनमान आणि क्रिकेटची गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे.”

Story img Loader