चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघ क्वॉलिफायर एकसाठी पात्र ठरले आहेत. शनिवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचा निकाल लागण्याआधीच हे निश्चित झाले. नेट रन रेटच्या आभावामुळे केकआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. या सामन्यापूर्वी अक्षर पटेलने कर्णधारपदाबाबत मोठे विधान केले आहे. मंगळवारी (२३ मे) क्वॉलिफायन १ सामना सीएसके आणि गुजरात टायटन्समध्ये खेळला जाईल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहीबाबत अक्षर पटेलचे मोठे विधान

अक्षर पटेलने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, “धोनीकडून त्याला खूप काही शिकायला मिळते. धोनी हा भारताचा सर्वात मोठा फिनिशर आहे. धोनीने भारताचे अनेक सामने जिंकवून दिले आहेत.” जेव्हा अक्षरला विचारण्यात आले की तो गेल्या काही महिन्यांत फिनिशर म्हणून उदयास आला आहे, एमएस धोनी एका वेळी टीम इंडियासाठी काय करत होता, अक्षर एमएस धोनीला माणूस म्हणून किंवा कर्णधार म्हणून कसे पाहतो. यावर अक्षर म्हणाला की, “धोनीबद्दल तो काहीही म्हणत असला तरी तो कसा आहे हे सर्वांना माहीत आहे.”

हेही वाचा: IPL2023: जेव्हा कॅप्टन कूलला राग येतो…, live मॅचमध्ये चेंडू बदलण्यावरून अंपायरशी बाचाबाची; पाहा Video

अक्षर पुढे म्हणाला की, “धोनीला माहित आहे की कोणत्या खेळाडूतून काय काढून घ्यायचे आहे आणि कोणत्या खेळाडूमध्ये क्षमता किती आहे.” तो पुढे म्हणाला की, “एक माणूस म्हणून धोनी नेहमी म्हणायचा की मी १०-१२ वर्षे क्रिकेट खेळेन, पण त्यानंतर तुम्हाला माणूस म्हणून कोण लक्षात ठेवेल, ही मोठी गोष्ट आहे.” तोही तसेच करतो आणि धोनीच्या या गोष्टी फॉलो करतो. अक्षर पटेलची ही खास मुलाखत तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराबाबत मोठा खुलासा

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघाची हंगामात खराब सुरुवात झाली कारण संघाने सलग पाच सामने गमावले आणि माजी क्रिकेटपटूंनी उपकर्णधार अक्षरला फ्रँचायझी कर्णधार म्हणून पदोन्नती दिली. नियमित कर्णधार ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नरकडे या हंगामात संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अक्षरने सांगितले की, “स्पर्धेच्या मध्यभागी कर्णधार बदलल्याने संघाची चुकीची ब्ल्यू प्रिंट ठरली असती.” कर्णधारपद मिळण्याच्या प्रश्नांवर अक्षर पटेल म्हणाला, “सध्या सुरू असलेल्या मालिकेत मी कोणाशीही काही बोलत नाही. कर्णधारपद माझ्याकडे असते तरी मी ते घेतले नसते. जर आयपीएलच्या मध्यात कर्णधारपद मला दिले असते तर मी ते नाकारले असते.”

हेही वाचा: IPL2023, RCB vs GT: आरसीबीच्या गोटात चिंता वाढली, पाऊस बिघडवणार का बंगळुरूचा खेळ? जाणून घ्या

अष्टपैलू खेळाडूने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “जेव्हा तुमचा संघ अशा वाईट काळातून जात असतो, तेव्हा अशा बदलांमुळे परिस्थिती आणखी वाईट होते. अशावेळी तुमच्या खेळाडूंना, कर्णधाराला पाठिंबा देण्याची गरज असते आणि जर हंगामाच्या मध्यावर कर्णधार बदलला तर तो चांगला संदेश जात नाही. मी कर्णधार असलो तरी गोष्टी तशाच राहू शकल्या असत्या.” आम्ही एक संघ म्हणून एकत्रितपणे अपयशी ठरलो आणि तुम्ही कर्णधाराला दोष देऊ शकत नाही.” तो म्हणाला, “मी कर्णधारपदाबद्दल कधीच बोललो नाही, पण जर मी कर्णधार झालो तर मी हंगामाच्या मध्यावर जबाबदारी स्वीकारणार नाही. मला ड्रेसिंग रूममधलं वातावरण बिघडवायचं नाहीये.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi capitals even if he gets the captaincy he doesnt take it akshar patel created panic with his statement avw