Gujarat Titans worried due to rain : आयपीएलचा १७वा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून गुजरात टायटन्सची चिंता वाढली आहे. अहमदाबादमध्ये सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यावर संकटाचे ढग आहेत. या सामन्यात अद्याप नाणेफेक झालेली नाही. यामध्ये सातत्याने विलंब होत आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. हा सामना झाला नाही तर गुजरातचा संघ प्ले ऑफमधून बाहेर पडेल.

पावसामुळे गुजरात टायटन्सची वाढवली चिता –

वास्तविक, गुजरात टायटन्स संघ १० गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. जर संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर त्याला उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. आजचा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यासह यासह गुजरात टायटन्सचे ११ गुण होतील. यानंतर जरी त्यांनी पुढील सामना जिंकला, तरी ते केवळ १३ गुण मिळवू शकतील. त्यामुळे ते प्लेऑफमधून बाहेर पडतील. कारण चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादचे आधीच १४ गुण झाले आहेत.

Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IND vs ENG Nitish Reddy Ruled out of England Series Rinku Singh Injured
IND vs ENG: भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा धक्का, दोन खेळाडू संघाबाहेर; BCCI ने जाहीर केला सुधारित संघ

अहमदाबादमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस –

अहमदाबादमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मैदान कव्हरने झाकले गेले आहे. काही वेळापूर्वी पाऊस मंदावला होता आणि सुपरसोपर्स जमीन कोरडे करण्यात व्यस्त होते. पंच आणि ग्राउंड स्टाफमध्ये संभाषणही झाले. मात्र, आता पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. मैदानात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मात्र, पाच षटकांच्या सामन्यांची कट ऑफ वेळ रात्री १०.५६ पर्यंत आहे. अजून सामन्याची नाणेफेकही झालेली नाही.

हेही वाचा – राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! जोस बटलर IPL 2024 च्या पुढील दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही

प्लेऑफ्सची लढत रोमांचक वळणावर पोहोचली –

प्लेऑफ्समध्ये स्थान मिळविणारा पहिला संघ केकेआरविरुद्ध या दोघांची कामगिरी टायटन्ससाठी खूप महत्त्वाची ठरेल. सध्या सात संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. राजस्थान रॉयल्स (१६) आणि सनरायझर्स हैदराबाद (१४) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्सचे समान १२ गुण आहेत. टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रत्येकी १० गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. गुजरात टायटन्सचा नेट रन रेट चांगला नाही आणि अशा परिस्थितीत संघाने अंतिम चारमध्ये स्थान मिळवले, तर ते चमत्कारापेक्षा कमी नसेल. मात्र, टायटन्स संघ जर-तर समीकरणात कायम राहण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, हे निश्चित.

Story img Loader