Hardik Pandya Reaction on Mumbai Indians Loss: आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची स्थिती सामन्यागणिक अधिक वाईट होत चालली आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ केवळ आठ सामन्यांमध्ये पाच वेळा पराभूत झाला आहे. काल. २२ एप्रिलला पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून टिचून पराभव केला आहे. सामन्यानंतर एमआयचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या पराभव का झाला व पुढच्या वेळी नक्की काय बदल करता येतील याविषयी भाष्य केलं आहे. हार्दिकने कुणाचंही प्रत्यक्ष नाव घेतलं नसलं तरी त्याच्या काही विधानांमधून सलामीवीरांकडे त्याचा रोख होता असं म्हणता येईल. नेमकं असं हार्दिक काय म्हणाला, चला बघूया..

पॉवरप्लेमध्येच गमावला सामना? हार्दिक काय म्हणाला?

सामन्यानंतरच्या सादरीकरणात, हार्दिकचं म्हणणं होतं की, पॉवरप्लेमध्ये नीट कामगिरी न झाल्याने एमआयने स्वतःला अडचणीत आणले. मॅचच्या हायलाईट सांगायच्या तर फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये रोहितने सहा धावा केल्या तर इशान किशन आपले खाते देखील उघडू शकला नाही. नंतर तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्या कामगिरीमुळे संघ १८० धावांपर्यंत पोहोचला. याविषयी हार्दिक म्हणाला की, “तिलक आणि नेहलने केलेली फलंदाजी कौतुकास्पद होती, सुरुवातीला दोन विकेट गमावल्यावर आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही १८० पर्यंतही पोहोचू. आम्ही फलदांजी करताना खेळ पद्धतीशीर संपवला नाही म्हणून १०- १५ धावा मागे पडलो.”

Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Jaydeep Gauri
मालिका संपल्यावर १ महिन्यातच जयदीप-गौरीचं ‘स्टार प्रवाह’वर कमबॅक! कारण आहे खूपच खास…; दोघांचा डान्स Video व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Hardik Pandya Throws Bat Curses Himself After His Wicket in IND vs ENG 3rd T20I Video Viral
IND vs ENG: हार्दिक पंड्याने आऊट झाल्यावर मैदानातच काढला राग, बॅट फेकली अन्… VIDEO व्हायरल
Hardik Pandya surpasses Bhuvneshwar Kumar to become Most balls bowled for India in T20I cricket
IND vs ENG : हार्दिक पंड्याची ऐतिहासिक कामगिरी! भुवनेश्वर कुमारला मागे टाकत केला मोठा पराक्रम
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…

आमच्यासाठी तो दिवस वाईट होता कारण…

तर गोलंदाजीच्या बाबत हार्दिक म्हणाला की, पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी आरआरच्या फलंदाजांना खूप जागा दिली होती. म्हणजे साधारण पॉवरप्लेमध्ये स्टंप्सवर रोखून मारा करणं आवश्यक आहे. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये आम्ही स्वैर मारा केला त्यामुळे खूप धावा दिल्या. क्षेत्ररक्षणातही आमच्या हातून खूप चुका झाल्या. सगळ्या आघाड्यांवर आमच्यासाठी तो दिवस चांगला नव्हता आणि याउलट राजस्थानने तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत आम्हाला मागे टाकलं. अर्थात सामना संपल्यावर खेळाडूंना दोष देण्यात अर्थ नाही. इथे प्रत्येक जण प्रोफेशनल आहे त्यांना त्यांची भूमिका माहिती आहे.”

हे ही वाचा<< “रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”

दरम्यान, राजस्थान रॉयल्सकडून दुसऱ्यांदा पराभूत झाल्यावर मुंबई इंडियन्स आपल्या गाठीशी सहा पॉईंट्स घेऊन सातव्या स्थानी आहे तर राजस्थान यंदाची सर्वात यशस्वी टीम बनत असून अजूनही १४ पॉईंट्ससह पहिल्या स्थानी कायम आहे.

Story img Loader