Richard Kettleborough’s statement on Sanju : आयपीएलच्या १७व्या हंगामानंतर आयसीसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला जूनमध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकात भारताचा १५ सदस्यीय संघ कसा असेल हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. आता माजी क्रिकेटपटूही विश्वचषकासाठी आपापल्या १५ सदस्यीय संघांची निवड करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय १ मे रोजी टीम इंडियाची घोषणा करू शकते. यावेळी टीम इंडियामध्ये अनेक तरुण नवे चेहरे दिसू शकतात आणि त्यामुळे काही दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट होऊ शकतो. अशात संजू सॅमसनला संधी देण्याबाबत मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान अंपायर रिचर्ड केटलबरोने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

अंपायरने निवडकर्त्यांना दिला इशारा!

दिग्गज अंपायर रिचर्ड केटलबरो यांनी आता संजू सॅमसनबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, “जर संजू सॅमसन आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ खेळला नाही, तर संजूपेक्षा हे भारताचे जास्त नुकसान होईल, असे वाटते.” याशिवाय सोशल मीडियावर माजी खेळाडू आणि चाहत्यांनीही संजूचा टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्याची मागणी सुरू केली आहे.

IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
IND vs ENG Jos Buttler becomes first player to score 600 runs in T20 cricket against India
IND vs ENG : जोस बटलरचा भारताविरुद्ध मोठा पराक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Arshdeep Singh Announces as ICC Mens T20I Cricketer of the Year 2024
ICC Men’s T20I Cricketer of the Year 2024: सिंग इज किंग! भारताचा अर्शदीप सिंग ठरला सर्वात्कृष्ट टी-२० खेळाडू २०२४; ICCने केली घोषणा
ICC Announces T20 Team of The Year 2024 Indias Rohit Sharma Named Captain of Squad
ICC T20I Team of The Year: ICC ने जाहीर केला सर्वाेत्कृष्ट टी-२० संघ २०२४, रोहित शर्मा कर्णधार; भारताच्या चार खेळाडूंना मिळाली संधी

आयपीएल २०२४ मध्ये, २७ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. राजस्थानने हा सामना ७ विकेटनी जिंकला. यासह राजस्थान आयपीएल २०२४ मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने अप्रतिम खेळी केली. संजूने लखनऊविरुद्ध ३३ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. यादरम्यान संजूने ७ चौकार आणि ४ शानदार षटकार मारले.

हेही वाचा – IPL 2024: राजस्थान रॉयल्सने १६ गुण मिळवूनही प्लेऑफचे तिकीट का मिळाले नाही? काय आहे नेमकं कारण

आयपीएल २०२४ मध्ये संजू सॅमसनची कामगिरी –

आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मोसमात राजस्थानचा संघ फक्त एकच सामना हरला आहे. ज्यामध्ये संजूची मोठी भूमिका आहे. या मोसमात आतापर्यंत संजूने ९ सामन्यात १६१ च्या स्ट्राईक रेटने ३८५ धावा केल्या आहेत. तो यंदाच्या हंगामात विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्यानंतर संजूची २०२४ टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड केली जावी, यासाठी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. मात्र, यावेळी यष्टिरक्षकांची निवड करणे निवडकर्त्यांसाठीही आव्हानात्मक असणार आहे. कारण संजू व्यतिरिक्त ऋषभ पंत आणि केएल राहुलही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत.

Story img Loader