दमदार सांघिक प्रदर्शन, जुन्या खेळाडूंची बदललेली भूमिका आणि श्रेयस अय्यरचं यशस्वी नेतृत्व या त्रिसुत्रीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने दशकभरानंतर आयपीएल जेतेपदावर कब्जा केला. गेल्या वर्षी कोलकाताला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. कोलकाताने चंद्रकांत पंडित यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली. विदर्भ आणि मध्य प्रदेश संघांना रणजी करंडक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. कोलकाता प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय किती योग्य होता हे दिसून आलं. कोलकाताने याआधी २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाताने हे यश मिळवलं होतं. युवा खेळाडूंशी संवाद-समन्वयन, संघ व्यवस्थापन आणि आयपीएल स्पर्धेचा अनुभव यामुळे गंभीर डगआऊटमध्ये असणं कोलकातासाठी अतिशय फायदेशीर ठरलं. अभिषेक नायर कोलकाता संघाचा आधारवड आहेत. कोलकाता संघाची फलंदाजी बघता अभिषेक यांची भूमिका किती निर्णायक आहे ते लक्षात येतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा