‘मुंबई इंडियन्स संघासाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. रोहित शर्मा सलग १० वर्ष मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याच्या नेतृत्वातच मुंबईने ५ जेतेपदं पटकावली आहेत. आता सिंहावलोकन करताना असं वाटतं की यंदाही त्यानेच नेतृत्व केलं असतं आणि हार्दिक २०२५ हंगामापासून कर्णधार झाला असता. मुंबईच्या संघव्यवस्थापनाने तो निर्णय घेतला. पण मला वाटतं मुंबईचा संघ चांगलं क्रिकेट खेळला नाही. त्यांच्या खेळात सातत्य नव्हतं. प्लेऑफमध्ये धडक मारण्याची त्यांच्यात क्षमता होती. मी यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्लेऑफचे चार संभाव्य संघ निवडले होते त्यात मुंबईचा संघ होता. नवा कर्णधार होता. खेळाडू फॉर्ममध्ये नव्हते. या सगळ्याचा परिणाम खेळात दिसून आला’, असं भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी सांगितलं. जिओ सिनेमासाठी आयपीएल एक्सपर्ट म्हणून कार्यरत कुंबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा