Rohit Sharma On Mumbai Indians Captaincy: “पहिली मॅच देवाला” वाहणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स असं पूर्वी चाहते गमतीत म्हणायचे, हळूहळू एमआयच्या संघाची ही ओळखही झाली, थोडक्यात आयपीएलचे सुरुवातीचे सामने संथ गतीने खेळण्यासाठी रोहित शर्माचा संघ ओळखला जात होताच. पण यंदा कर्णधार पदाची जबाबदारी पांड्याकडे जाताच पहिलीच मॅच नव्हे तर सहापैकी चक्क ४ सामन्यांवर मुंबईच्या संघाला पाणी सोडावे लागले आहे. आयपीएलची गुणतालिका पाहिल्यास आता मुंबईचा संघ चार दुर्दैवी पराभव व दोन विजयांसह शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वीच्या हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सच्या नावावर सुरुवातीला पराभव जास्त असले तरी कमबॅकही दमदार व्हायचा पण यावेळची चित्र जरा वेगळीच आहेत. यंदा पाच वेळा चषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्माकडे कर्णधारपद नसल्याने स्थिती खरंच बदलेल का याविषयी टीम एमआयचे चाहते सुद्धा साशंक आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा