IPL Code of Conduct Rule 2.21 : आयपीएल २०२३ चा ४३ वा सामना १ मे रोजी एलएसजी आणि आरसीबी संघात खेळला गेला. लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या या कमी धावसंख्येच्या सामन्यात आरसीबीने यजमानांचा १८ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान बंगळुरूचा विराट कोहली आणि लखनऊचे नवीन-उल-हक, अमित मिश्रा, काईल मेयर्स आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली.

या वादावादीनंतर बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीरवर १०० टक्के मॅच फीचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर नवीन-उल-हकला ५० टक्के मॅच फीचा दंड आकारला. आयपीएल आचारसंहितेच्या कोणत्या नियमानुसार विराट आणि गंभीर यांना दंड ठोठावण्यात आला आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

police file case for forcing girl to perform obscene act in shelter home
धक्कादायक : लेस्बियन असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर बळजबरी, अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Moin Khan father of Azam khan criticizes PCB Former Chief Ramiz Raja
‘फक्त एका सामन्यानंतर…’, मुलावर झालेल्या अन्यायासाठी मोईन खानने रमीझ राजाला धरले जबाबदार; म्हणाला, ‘त्याने युवा…’
kalyan dombivli municipal corporation marathi news
कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस, मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार? सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे!
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !

गंभीर-कोहलीने नियम २.२१ चे उल्लंघन केले –

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलमधील सामन्यादरम्यान खेळाडूंच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आचारसंहिता बनवली आहे. ज्याला आयपीएल आचारसंहिता (आयपीएल कोड ऑफ कंडक्ट) म्हणतात. सामन्यादरम्यान खराब वर्तन केल्याबद्दल, या आचारसंहितेत समाविष्ट असलेल्या नियमांनुसार खेळाडूंना शिक्षा केली जाते. लखनऊ आणि बंगळुरू सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादानंतर दोघांना आयपीएल आचारसंहितेच्या नियम २.२१ अंतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा – Naveen ul Haq: कोण आहे ‘नवीन’? ज्याच्यामुळे कोहली आणि गंभीर पुन्हा एकदा भिडले, जाणून घ्या

काय आहे २.२१ आचारसंहिता नियम?

आयपीएल आचारसंहिता २.२१ मध्ये त्या सर्व गोष्टींचा समावेश आहे, ज्यामुळे खेळाची बदनामी होते. यामध्ये जाणूनबुजून केलेले गुन्हे, खेळाला प्रतिकूल अशा अयोग्य टिप्पण्या आणि सार्वजनिक गैरवर्तन यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर आयपीएल आचारसंहिता २.२१ च्या उल्लंघनासाठी दोषी आढळले आहेत.

हेही वाचा – RCB vs LSG: लखनऊच्या खेळाडूंशी झालेल्या वादानंतर विराट कोहलीची ‘ती’ इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल, जाणून घ्या काय आहे?

कोणाला किती दंड ठोठावला?

विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांच्यातील जोरदार वादाची दखल घेत बीसीसीआयने दोघांना दंड ठोठावला आहे. बोर्डाने विराट कोहलीला १०० टक्के मॅच फी म्हणजेच १.०७ कोटी रुपये, गौतम गंभीरला १०० टक्के मॅच फी म्हणजेच २५ लाख रुपये आणि नवीन-उल-हकला ५० टक्के मॅच फी म्हणजेच १.७९ लाख रुपये दंड ठोठावला आहे. या तिघांनीही आयपीएल आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार नाही.