आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यातील वादाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. सोमवारी सामना संपल्यानंतर दोघेही मैदानात भिडले होते. यानंतर सोशल मीडियावर चाहते दोन गटात विभागले गेले. काहीजण कोहलीला बरोबर सांगत आहेत, तर काही चाहते गंभीरची बाजू घेत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दोघांनी वाद संपवायला पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले की, “त्यांना हवे असल्यास मी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मी दोघांमध्ये मैत्री घडवून आणायला तयार आहे.”

एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान भारताचे माजी प्रशिक्षक म्हणाले, “मला वाटते की हा वाद एक-दोन दिवसांत शांत होईल. तेव्हा त्यांना (कोहली-गंभीर) लक्षात येईल की ते हे प्रकरण अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आले असते. दोघेही एकाच राज्यासाठी (दिल्ली) खेळतात आणि भरपूर क्रिकेट खेळले आहेत. गौतम दुहेरी विश्वचषक विजेता आहे, विराट आयकॉन आहे. दोघेही दिल्लीहून आले आहेत. मला वाटते की दोघांनीही समोरासमोर बसून हा वाद कायमचा संपवायला लावणे हीच सर्वात चांगली गोष्ट आहे.”

मी मध्यस्थी करण्यास तयार- रवी शास्त्री

शास्त्री म्हणाले, “जितक्या लवकर जो कोणी हा वाद संपवण्याचा प्रयत्न करेल, तितक्या लवकर ते चांगले राहील. कारण हे प्रकरण आणखी वाढून जगासमोर यावे असे मला वाटत नाही. हे भांडण असेच चालू राहिल्यास, पुढच्या वेळी जेव्हा ते पुन्हा भेटतात आणि शब्दांची देवाणघेवाण होईल, तेव्हा आणखी गोष्टी बिघडू शकतात. एका वादामुळे दुसरा वाद निर्माण होतो. हा वाद जितक्या लवकर संपेल तितके चांगले. जर मला दोन स्टार खेळाडूंमध्ये मध्यस्थी करावी लागली तर मी नक्की करेन.”

हेही वाचा: IPL 2023: “हे तुम्हीच ठरवलंय वाटतं…”, एम.एस. धोनीचे नाणेफेकी दरम्यान निवृतीबाबत मोठे विधान

या संपूर्ण वादाची सुरुवात कुठून झाली?

लखनऊच्या डावाच्या १७व्या षटकात विराट स्टंपच्या मागून धावत आला आणि नवीनला काहीतरी इशारा करत असताना संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. त्यावर अफगाणिस्तानचा नवीनही त्याच्या जवळ आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादादरम्यान विराटने आपल्या बुटाकडे बोट दाखवत त्यावरून चिखल काढत स्टेटसबद्दल चिडवले. बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोहली आणि अमित मिश्रा यांच्यातही वाद झाला.

हेही वाचा: IPL 2023: “जिथे जातो तिथे वाद घालतो…”, अफगाणिस्तानच्या नवीन-उल-हकवर शाहिद आफ्रिदीची सडकून टीका

बंगळुरूच्या विजयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना कोहलीने नवीनला काहीतरी सांगितले. कोहली बोलताच नवीनही घाबरत काहीतरी बोलताना दिसला. येथेही दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर कोहली चालत असताना तो लखनऊच्या काइल मेयर्सशी बोलू लागला. त्यानंतर गंभीर येतो आणि मेयर्सला विराटपासून दूर घेऊन जातो आणि त्याच्याशी बोलण्यास नकार देतो. यानंतर गंभीर काहीतरी बोलतो, ज्यावर कोहली त्याला जवळ बोलावतो आणि दोघे खूप जवळ येतात. त्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. शेवटी कोहली आणि लोकेश राहुल यांच्यात दीर्घ संवादही पाहायला मिळाला.

Story img Loader