आयपीएलनंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC फायनल) खेळायची आहे. भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्याने तो संघापासून दूर आहे आणि टीम इंडियाची योजना के.एल. राहुलला येथे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आजमावण्याची होती पण आता तो देखील दुखापतीमुळे बाहेर आहे. दरम्यान, भारतीय कसोटी संघाच्या प्लॅनमधून बाहेर पडलेला ऋद्धिमान साहा या भूमिकेसाठी योग्य वाटतो. साहाची किपिंग जबरदस्त आहे, याशिवाय तो आयपीएलमध्येही खूप धावा करत आहे.

रविवारी गुजरातकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या साहाने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध ४३ चेंडूत ८१ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकारही ठोकले. त्याने शुबमन गिलला (९४*) सोबत घेत सलामीच्या विकेटसाठी १४२ धावा जोडल्या. साहाच्या या फलंदाजीनंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की, टीम इंडिया जेव्हा यष्टीरक्षक फलंदाजाच्या शोधात आहे, तेव्हा साहाची कसोटी संघात निवड का करण्यात येऊ नये.

new ST buses in phased manner 110 buses have been made available
जेजुरी बसस्थानकात चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
writer dr ashok kamat passes away at age of 83
डॉ. अशोक कामत यांचे निधन
Miraj Sitar, Sitar postage stamp, Sangli ,
सांगली : मिरजेतील सतारीला आता टपाल तिकिटावर स्थान
Manohar Joshi Chitampally Ashok Saraf to be conferred with Padma Bhushan Award Mumbai news
मनोहर जोशी, चितमपल्ली, अशोक सराफ यांना ‘पद्म’ ; चैत्राम पवार, पालव,डॉ. डांगरेही मानकरी
Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : Gautam says Sourav Ganguly apna jack laga ke aaya Manoj Tiwary has revealed
Manoj Tiwary : ‘तो जॅक लावून आला आणि तू पण…’, गंभीरने गांगुलीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; मनोज तिवारीचा खुलासा
Suryakumar Yadav Statement on Not Being Selected in India Champions Trophy Squad Said I didnt Perform well
Champions Trophy: सूर्यकुमार यादवची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड न होण्यामागे कोण जबाबदार? सूर्या उत्तर देताना म्हणाला, “मी जर…”

असा सवाल भारताचा माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेशनेही आपल्या ट्विटर हँडलवर विचारला आहे. साहाच्या या खेळीनंतर गणेशने ट्विटरवर प्रश्न केला की “साहा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये असावा का?” यासोबतच त्याने क्रिकेट ट्विटर हा हॅशटॅग वापरला आहे. या सामन्यात साहाने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि आता तो गुजरात टायटन्ससाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज देखील आहे. पण डिसेंबर २०२१ पासून साहा भारतीय कसोटी संघाचा भाग नाही. बीसीसीआयच्या वरिष्ठ संघाच्या निवडकर्त्यांनी भारतीय संघाच्या भविष्याचा विचार करून साहाला त्यांच्या निवड योजनांमधून बाहेर ठेवले होते, परंतु आता टीम इंडियाकडे या स्थानासाठी दुसरा पर्याय नसल्याने निवडकर्त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसारखे सामने लक्षात घेता त्याचा विचार करावा लागेल.

हेही वाचा: IPL2023: “तुम्ही किती मोठे खेळाडू आहात, कर्णधार…”, रोहित शर्माच्या फलंदाजीवर रवी शास्त्रींचे मोठे विधान

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही वर्षांपूर्वी ऋद्धिमान साहाला निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. मात्र तोच खेळाडू सध्या आयपीएल गाजवत असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी संघाचे दार ठोठावत आहे. ऋद्धिमान साहाला भारतीय संघातून वगळल्यानंतर बराच वाद झाला होता. साहाने उघडपणे सांगितले होते की, बीसीसीआयचे तत्कालीन प्रमुख सौरव गांगुली यांनी त्याला संघात ठेवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र, राहुल द्रविड यांनी वरिष्ठ पत्रकाराशी झालेल्या वादानंतर त्याचे भविष्य ठरवण्यास सांगितले होते. साहा म्हणाला की, “द्रविडने त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. राहुल द्रविडनेही आपण तसे बोलल्याचे मान्य केले होते.”

Story img Loader