IND vs AUS Jasprit Bumrah and Sam konstas Fight: भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीत मोठा रोमांच अनुभवायला मिळत आहे. भारतीय संघ पहिल्या दिवशी ऑल आऊट झाला तर अखेरच्या सत्रात फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियानेही एक विकेट गमावली. पण यादरम्यान सॅम कॉन्स्टासने बुमराहशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, जो ऑस्ट्रेलियाला पुढच्याच चेंडूवर चांगलाच भारी पाडला. सॅम कॉन्स्टास मेलबर्न कसोटीपासून भारतीय संघाशी आणि बुमराहशी वादात उडी घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण बुमराहने त्याला वेळोवेळी चोख उत्तर दिलं आहे.

सिडनी कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेला भारतीय संघ १८५ धावा करून पहिल्याच दिवशी सर्वबाद झाला. भारताची टॉप फलंदाजी ऑर्डर फेल ठरल्याने भारताने झटपट विकेट गमावल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या धावांच्या आशांवर पाणी फेरलं. यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपताना अखेरची १५ मिनिटं शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी उतरला.

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
Kriti Sanon joins tere ishq mein
Video : दंगल, जाळपोळ अन् मनात प्रेमाचं वादळ; ‘तेरे इश्क में’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा पहिला व्हिडीओ आला समोर
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

हेही वाचा – IND vs AUS: “रोहित शर्मासाठी मेलबर्न कसोटी शेवटची…”, सिडनी कसोटीदरम्यान सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य

बुमराहशी कॉन्स्टासने मुद्दाम घातला वाद

ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीसाठी सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजाची जोडी उतरली. भारताकडून बुमराहने गोलंदाजीला सुरूवात केली. कॉन्स्टासने पुढे येऊन पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि सामन्याला सुरूवात केली. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या षटकात ६ धावा केल्या. तर दुसऱ्या षटकात सिराजने चांगली गोलंदाजी करत २ धावा दिल्या. पुढचे षटक टाकण्यासाठी बुमराह आला होता. भारताला दिवसाचा खेळ संपेपर्यंत जास्तीत जास्त षटक टाकून विकेट्स घेण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच षटकात बुमराहचा चेंडू ख्वाजाच्या बोटाला लागला आणि त्याचं बोट सुजलं होतं. त्यात काही वेळ गेला होता.

हेही वाचा – IND vs AUS : ‘…हे स्वतः फलंदाजाला कळतं’, रोहित शर्माबद्दल इरफान पठाणचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येक खेळाडू…’

बुमराह आणि कॉन्स्टासमध्ये नेमका कशावरून झाला वाद?

यानंतर बुमराहने त्याचे षटक पूर्ण व्हावे यासाठी तिसऱ्या षटकात झटपट रनअपसाठी तयार होत गोलंदाजी करत होता. बुमराह पाचवा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेत होता. तर ख्वाजा त्याला थांबवत होता. बुमराह परत तयार झाला आणि ख्वाजाने पुन्हा एकदा त्याला थांबण्याचा इशारा दिला. तर बुमराहने काय प्रकार आहे असं हातवारे करत म्हटलं. तितक्यात नॉन स्ट्रायकर एंडवर उभा असलेला कॉन्स्टस मागे वळून बुमराहला बोलू लागला रनअपसाठी तयार असलेला बुमराह तुला काय प्रॉब्लेम आहे?, असं सातत्याने म्हणत पुढे आला तितक्यात पंचांनी मध्यस्थी केली. मुख्य म्हणजे बुमराह पूर्णवेळ उस्मान ख्वाजाबरोबर बोलत होता की जेणेकरून बुमराह त्याचे षटक पूर्ण करू शकेल, पण ख्वाजा तयार होत असताना कॉन्स्टास अचानक बुमराहला काहीतरी बोलू लागला आणि मग हा वाद झाला.

हेही वाचा – India 2025 Cricket Calendar: इंग्लंड दौरा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकप…, भारताच्या क्रिकेट सामन्यांचं २०२५ मध्ये कसं असणार वेळापत्रक?

पंचांनी मध्यस्थी करताच बुमराह आणि कॉन्स्टास एकमेकांना काहीतरी म्हणत माघारी गेले आणि बुमराहने गोलंदाजी केली तर ख्वाजाने तो चेंडू खेळला पण धाव नाही घेतली. यानंतर अखेरच्या चेंडूवर बुमराहने टाकलेला चेंडू डावखुऱ्या ख्वाजाने खेळला आणि चेंडू बॅटची कड घेत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलच्या दिशेने गेला आणि राहुलने एक उत्कृष्ट झेल टिपताच भारताला पहिली विकेट मिळाली अन् बुमराहने चांगलाच बदला घेतला. विकेट मिळताच भारताच्या संपूर्ण संघाने जबरदस्त सेलिब्रेशन करत कॉन्स्टासची बोलती बंद केली. अशारितीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने

Story img Loader