Javed Miandad’s reaction to ODI World Cup 2023: पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियांदादने पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. त्याच्या मते जोपर्यंत भारताचा संघ पाकिस्तानमध्ये खेळायला येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आणि इतर सामन्यांसाठी भारतात जाऊ नये. तो म्हणाला, पाकिस्तानच्या संघाला भारतात खेळायला न गेल्याने कोणताही फरक पडणार नाही. आता भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये येण्याची पाळी आहे.

आयसीसीने तयार केलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या मसुद्यानुसार, अहमदाबादमध्ये १५ ऑक्टोबरला भारत-पाक हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. तथापि, ६६ वर्षीय पाकिस्तानचा माजी कर्णधाराचे म्हणने आहे की, आता भारताची पाकिस्तान दौऱ्याची पाळी आहे. मियांदाद म्हणाला, “पाकिस्तानचा संघ २०१२ आणि २०१६ मध्येही भारतात गेला होता. आता येथे येण्याची पाळी भारतीय संघाची आहे. जर निर्णय घेणे माझ्या हातात असते, तर मी भारतात कधीही कोणताही सामना खेळायला गेलो नसतो, अगदी विश्वचषकही नाही.आम्ही त्यांच्याशी (भारत) खेळण्यासाठी नेहमीच तयार असतो, परंतु ते कधीही तशाच प्रकारे प्रतिसाद देत नाहीत.”

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
AFG vs NZ Test Match at Greater Noida Stadium Catering Using Washroom Water For Food
AFG vs NZ: टॉयलेटमध्ये धुतली भांडी; नोएडात आदरातिथ्याची लक्तरं; AFG vs NZ सामना होत असलेल्या स्टेडियमधील संतापजनक घटना
Afghanistan Cricket Team Is Very Unhappy With Facilities Of Greater Noida Stadium
AFG vs NZ: “आम्ही इथे कधीच परत येणार नाही…”, ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या गैरव्यवस्थापनावर अफगाणिस्तान संघ संतापला, नेमकं काय घडलं?
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Babar Azam Retirement From Test Cricket Fake Post Goes Viral on Social Media
PAK vs BAN: पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझमने कसोटीमधून घेतली निवृत्ती? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण

भारतात न गेल्याने काही फरक पडणार नाही –

मियांदाद पुढे म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट मोठे आहे. आम्ही अजूनही दर्जेदार खेळाडू तयार करत आहोत. त्यामुळे आम्ही भारतात न गेल्याने आम्हाला काही फरक पडेल, असे मला वाटत नाही.” भारताने २००८ मध्ये ५० षटकांच्या आशिया चषकासाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणावामुळे द्विपक्षीय क्रिकेट सामने होत नाहीत.

हेही वाचा – TNPL 2023: मुरुगन अश्विनने हवेत उडी मारून पकडला आश्चर्यकारक झेल, VIDEO होतोय व्हायरल

खेळांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे –

खेळांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे मियांदादचे मत आहे. तो म्हणाला, “मी नेहमीच म्हणत आलो की, कोणीही आपला शेजारी निवडू शकत नाही. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करणे चांगले. मी नेहमीच म्हणत आलो की क्रिकेट हा एक असा खेळ आहे, जो लोकांना जवळ आणतो. तसेच देशांमधील गैरसमज आणि तक्रारी दूर करू शकतो.”

आशिया चषकाच्या ‘हायब्रीड मॉडेल’वर मियांदादची प्रतिक्रिया –

मियांदादची प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा पाकिस्तानला ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत आगामी आशिया चषक आयोजित करण्यास भाग पाडले जात आहे. भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारतावर जोरदार टीका करणारा मियांदाद या निर्णयावर खूश नाही. तो म्हणाली, “आशिया चषकासाठी ते एकदाही आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नाहीत, असा विश्वास होता. त्यामुळे आता आम्हीही कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे.”