Rahul Dravid on Johny Bairstow: क्रेग ब्रॅथवेटच्या नेतृत्वाखालील यजमान वेस्ट इंडीज आपली सर्वोत्तम कामगिरी देण्यास सज्ज आहेत. १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड वेस्ट इंडीजमधील एका हॉटेलमध्ये अ‍ॅशेस मधील दुसऱ्या कसोटी सामन्यातील जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त विकेटवर बारटेंडर आणि वेटरशी तब्बल एक तास चर्चा केली. याचा खुलासा भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केला आहे.  

रविचंद्रन अश्विन याने अलीकडेच खुलासा केला की टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वेस्ट इंडिजमधील एका बारटेंडरशी जॉनी बेअरस्टोच्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत वादग्रस्त स्टंपिंगबाबत खूप वेळ चर्चा केली होती. अनुभवी फिरकीपटूने सांगितले की, “द्रविडच्या एका बारटेंडर आणि वेटरशी झालेल्या संभाषणादरम्यान, दुसर्‍या चाहत्याने बेअरस्टोला बाद दिले हा योग्य निर्णय असल्याचे मत मांडले.”

अश्विनने घडलेला किस्सा त्याच्या युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे. तो म्हणाला, “दुसऱ्या दिवशी, आम्ही समुद्रकिनाऱ्यावर बसलो होतो आणि राहुल भाईंनी माझ्यासाठी लेमन ज्यूस विकत घेतला. त्यांनी बारटेंडर आणि वेटरशी जॉनी बेअरस्टो आउट आहे की नॉट आउट यावर एक तास चर्चा केली. ते नियमांबद्दल बोलले. क्रिकेट, आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या चर्चेत आहे. ते क्रिकेटबाबत खूप जागरूक आणि उत्साही आहेत. तेवढ्यात अचानक एक म्हातारा आला आणि म्हणाला, ‘हा इंग्लंडचा बेअरस्टो खेळाडू आऊट आहे!’”

हेही वाचा: Virat Kohli: खास कामगिरी करणार्‍या किंग कोहलीच्या शिरपेचात आणखी एक तुरा! ‘या’ यादीत पटकावले पहिले स्थान

उल्लेखनीय म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत बेअरस्टोच्या विकेटमुळे क्रिकेट जगतात दोन मते तयार झाली. कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर तो क्रीझमधून बाहेर पडल्याने अ‍ॅलेक्स कॅरीने त्याला स्टंपिंग केले. अश्विनने वेस्ट इंडिजमध्ये मॅरूनमधील भारताच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी घडलेली आणखी एक घटना सांगितली.

आर. अश्विन म्हणाला, “आम्ही सर्वजण मॅरूनमध्ये एका ठिकाणी जेवायला गेलो होतो. मी, दिलीप सर, राहुल द्रविड, विक्रम राठोड, आम्ही सर्वजण. त्यावेळी आम्ही एक रेस्टॉरंट पाहिले. एक म्हातारा आला आणि त्याने आम्हाला त्याच्याच कॅरेबियन भाषेत विचारले, ‘तुम्हाला जेवायचे आहे का? तुम्ही ड्रिंक वेगेरे घेणार का?’ मग अचानक तो आम्हा सगळ्यांना ओळखू लागला आणि म्हणाला, ‘मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही क्रिकेटरसारखे दिसता. तुम्ही अश्विन आहात, तुम्ही राहुल द्रविड आहात’. तो खरेतर आम्हाला मागील काळातील आमच्या आठवनींना उजाळा देत होता. त्याच्याकडून जीवन कसे जगायचे हे शिकायला मिळाले.”

हेही वाचा: Sunil Chhetri: “भारतासाठी सर्वोत्तम देण्याचा विचार येईल तेव्हा मी मेस्सी अन् रोनाल्डोलाही…”, कर्णधार सुनील छेत्रीचे मोठे विधान

रविचंद्रन अश्विनने त्यादरम्यान सांगितले की, “आम्ही डॉमिनिका, कॅरिबियन बेटांवर सध्या येथे पोहोचलो असून ही पूर्णपणे वेगळी माशांची किटली आहे. मी गेल्या १४ वर्षांपासून येथे येत आहे. एवढ्या वर्षात कॅरिबियन बेटांमध्ये काहीही बदलले नाही. जर काही असेल तर ते प्रत्यक्षात आमचे वय बदलले आहे. मात्र, इथे आल्यावर आम्हाला मागील आयुष्यात परत जाता आले आणि जीवन कसे जगायचे हे वेस्ट इंडीजने शिकवले.” अश्विनने वेस्ट इंडिजमध्ये चार कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात २३.१७च्या सरासरीने १७ विकेट्स घेतले आहेत. याशिवाय, त्याने वेस्ट इंडिजमध्येही दोन कसोटी शतके ठोकली आहेत.

Story img Loader