ऑस्ट्रेलियन संघ २०१७ मध्ये भारत दौऱ्यावर आला तेव्हा केएल राहुलने सहा अर्धशतकांच्या मदतीने ३९३ धावा केल्या होत्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू होता. यानंतर, केएल राहुलने २०१८ मध्ये खराब फॉर्मचा सामना केला, परंतु ओव्हलवर १४९ धावांची खेळी खेळण्यात यशस्वी झाला. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

कसोटी संघात पुनरागमन केल्यानंतर, राहुलने लॉर्ड्स आणि सेंच्युरियन येथे शतके झळकावून कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले. आता ऑस्ट्रेलियन संघ सहा वर्षांनंतर भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी पुनरागमन करत आहे, मात्र यावेळी केएल राहुलच्या जागेला धोका निर्माण झाला आहे. शुबमन गिलच्या उदयानंतर राहुलला कसोटीत सलामी द्यायची की मधल्या फळीत फलंदाजी करायची हा चर्चेचा विषय बनला आहे. या सगळ्या गोष्टींदरम्यान केएल राहुलने आपलं मौन सोडलं आहे.

संघाला गरज असेल तर मी मधल्या फळीत फलंदाजी करण्यास तयार

पहिल्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाला की, संघ व्यवस्थापनाची इच्छा असल्यास मी मधल्या फळीत खेळण्यास तयार आहे. राहुलने प्रसारमाध्यमांना सांगितले की, “जर संघाला मी मधल्या फळीत फलंदाजी करावी असे वाटत असेल तर मी तसे करण्यास तयार आहे.” असे झाल्यास गिलला सलामीवीर म्हणून जागा मिळू शकते. भारत कोणाला आणि किती फिरकीपटूंसोबत जाणार यावर राहुलने संघाचे मत स्पष्ट केले. त्याने कबूल केले की संघ तीन फिरकीपटूंसह जाईल पण ते कोण असतील हे खेळपट्टी ठरवेल. तो म्हणाला, “भारतातील अधिक वळण घेणाऱ्या खेळपट्ट्यांमुळे तीन फिरकीपटू खेळवण्याचा मोह कायम राहील, पण बाकीची खेळपट्टी खेळाच्या दिवशी पाहिल्यानंतर कळेल.”

ऑफबीट खेळायचे की नाही

यावेळी वेगवान क्रिकेट खेळून इंग्लंडने कसोटी सामन्यांमध्ये काही जबरदस्त निकाल मिळवले आहेत. भारतीय संघ या प्रकारचे क्रिकेट थोडे खेळू शकतो का, असा प्रश्नही राहुलला विचारण्यात आला, राहुलने ते नाकारले नाही तर ते परिस्थितीवर अवलंबून असेल, असे ठामपणे सांगितले. तो म्हणाला, “जर परिस्थितीने आम्हाला मोकळेपणाने खेळण्याची मागणी केली तर आम्ही ते स्वीकारू अन्यथा आम्ही नियमित कसोटी क्रिकेट फलंदाजीला चिकटून राहू.”

हेही वाचा: Turkey Earthquake: ‘काळ आला होता पण…’ स्टार फुटबॉलपटूला ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढण्यात यश

अंतिम अकरा ही रोहित शर्मासाठी डोकेदुखीपेक्षा कमी नाही

भारतीय संघात ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर (पहिल्या कसोटीत) यांच्या अनुपस्थितीत श्रीकर भरत, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या खेळाडूंना संधी मिळणार आहे. सलामीच्या जागेसाठी राहुल आणि शुबमन गिल यांच्यात स्पर्धा सुरू आहे. भारताकडे मधल्या फळीत तीन फिरकी गोलंदाज असू शकतात. अक्षर, अश्विन आणि जडेजा, हे सर्व अष्टपैलू आहेत. पण कुलदीपला तिसरा फिरकीपटू म्हणून खेळवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे, ज्याचा सल्ला अलीकडे रवी शास्त्री यांनी दिला आहे. ९ फेब्रुवारीला संघ काय करतो हे नागपुरात पाहायचे आहे.

Story img Loader