IND vs ENG Match Today: रविवारी लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक २०२३ सामन्याआधी केएल राहुलने पत्रकार परिषदेत स्वतःच्या रिकव्हरीच्या कालावधीतील अनुभव शेअर केला आहे. राहुल म्हणाला की, “मी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ लागल्यापासून लोक काय म्हणतात याचा माझ्यावर होणारा परिणाम कमी झाला आहे. मी कोणाचं म्हणणं मनाला लावून घेत नाही. मी कणखर झालो आहे. त्याशिवाय रोहित शर्माने मला दिलेला एक सल्ला माझ्यासाठी खूप कामी आला आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असणाऱ्या राहुलला दुखापतीमुळे २०२३ चे आयपीएल सीझन अर्धवटच सोडावे लागले होते. त्यानंतर लोकांच्या बोलण्याचा आपल्या मनावर कसा परिणाम झाला याविषयी राहुल सांगतो की, “मला असं वाटत होतं की लोक काय बोलतील याचा मला फरक पडत नाही पण गेल्या वर्षभरात माझ्यावर या गोष्टींचा खूप परिणाम होऊ लागला. यातून बाहेर पडण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. मानसिकदृष्ट्या तुम्हाला बळकट होण्यासाठी कणखर असणे आवश्यक आहे. शिवाय जसे फलंदाजी तज्ज्ञ आहेत, गोलंदाजी तज्ज्ञ आहेत, तसेच मानसिक तज्ज्ञ सुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांची मदत तुम्ही नक्कीच घेऊ शकता.”

आशिया कप दरम्यान, राहुलने BCCI.TV ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मांडीच्या दुखापतीबद्दल खुलासा केला होता. “बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना मला दुखापत झाली आणि माझे टेंडन निखळले. हॅमस्ट्रिंग पूर्ण फाटले होते, माझे टेंडन माझ्या क्वाड्रिसिप्सपासून वेगळे झाले होते.”

जेव्हा यातून राहुल रिकव्हर होत होता तेव्हा प्रक्रियेत त्याने फलंदाजीपेक्षा त्याच्या कीपिंगवर कसे अधिक काम केले याबद्दलही सांगितले होते, तो म्हणाला, “रिकव्हरी दरम्यान मला असे वाटले की यष्टिरक्षणात तरबेज होण्यासाठी सुद्धा मला अधिक वेळ द्यावा लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. खरंतर हे अन्य सर्व कौशल्यांसारखंच आहे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जितका सराव कराल, मेहनत घ्याल तितके त्यात अधिक तरबेज व्हाल. मी विकेटकीपिंगला गांभीर्याने घेत आहे कारण या परिस्थितीत प्रत्येक भूमिकेचे तंत्र परफेक्ट असणे आवश्यक आहे आणि मला सगळ्या आवश्यक गोष्टी पूर्ण करायच्या आहेत.”

हे ही वाचा<< “मी ‘त्या’ कटू आठवणी विसरायचा प्रयत्न करतोय पण..”, IND vs ENG सामन्याआधी के. एल राहुलने व्यक्त केली खंत

दरम्यान, रोहित शर्माच्या सल्ल्याविषयी सांगताना राहुलने म्हटले की, “रोहितच्या गाईडबुक प्रमाणे मागील काही महिन्यांमध्ये मी सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला होता ज्यामुळे इतरांच्या बोलण्याचा स्वतःवर फरक न पडू देण्यासाठी खुप मदत झाली.”

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असणाऱ्या राहुलला दुखापतीमुळे २०२३ चे आयपीएल सीझन अर्धवटच सोडावे लागले होते. त्यानंतर लोकांच्या बोलण्याचा आपल्या मनावर कसा परिणाम झाला याविषयी राहुल सांगतो की, “मला असं वाटत होतं की लोक काय बोलतील याचा मला फरक पडत नाही पण गेल्या वर्षभरात माझ्यावर या गोष्टींचा खूप परिणाम होऊ लागला. यातून बाहेर पडण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. मानसिकदृष्ट्या तुम्हाला बळकट होण्यासाठी कणखर असणे आवश्यक आहे. शिवाय जसे फलंदाजी तज्ज्ञ आहेत, गोलंदाजी तज्ज्ञ आहेत, तसेच मानसिक तज्ज्ञ सुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांची मदत तुम्ही नक्कीच घेऊ शकता.”

आशिया कप दरम्यान, राहुलने BCCI.TV ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मांडीच्या दुखापतीबद्दल खुलासा केला होता. “बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना मला दुखापत झाली आणि माझे टेंडन निखळले. हॅमस्ट्रिंग पूर्ण फाटले होते, माझे टेंडन माझ्या क्वाड्रिसिप्सपासून वेगळे झाले होते.”

जेव्हा यातून राहुल रिकव्हर होत होता तेव्हा प्रक्रियेत त्याने फलंदाजीपेक्षा त्याच्या कीपिंगवर कसे अधिक काम केले याबद्दलही सांगितले होते, तो म्हणाला, “रिकव्हरी दरम्यान मला असे वाटले की यष्टिरक्षणात तरबेज होण्यासाठी सुद्धा मला अधिक वेळ द्यावा लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. खरंतर हे अन्य सर्व कौशल्यांसारखंच आहे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जितका सराव कराल, मेहनत घ्याल तितके त्यात अधिक तरबेज व्हाल. मी विकेटकीपिंगला गांभीर्याने घेत आहे कारण या परिस्थितीत प्रत्येक भूमिकेचे तंत्र परफेक्ट असणे आवश्यक आहे आणि मला सगळ्या आवश्यक गोष्टी पूर्ण करायच्या आहेत.”

हे ही वाचा<< “मी ‘त्या’ कटू आठवणी विसरायचा प्रयत्न करतोय पण..”, IND vs ENG सामन्याआधी के. एल राहुलने व्यक्त केली खंत

दरम्यान, रोहित शर्माच्या सल्ल्याविषयी सांगताना राहुलने म्हटले की, “रोहितच्या गाईडबुक प्रमाणे मागील काही महिन्यांमध्ये मी सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला होता ज्यामुळे इतरांच्या बोलण्याचा स्वतःवर फरक न पडू देण्यासाठी खुप मदत झाली.”