Yashasvi Jaiswal KL Rahul Highest Partnership: पर्थ कसोटीतील पहिल्या डावात १५० धावांवर सर्वबाद झालेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात सलामीवीरांच्या फटकेबाजीच्या जोरावर एकही विकेट न गमावता १९७ धावा केल्या आहेत. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी १७ विकेट पडल्या. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या १५० धावांत गारद झाली. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव १०४ धावांत गुंडाळला. यानंतर दुसऱ्या डावाची सुरूवातही भारताने जबरदस्त केली आणि जुना विक्रम मोडीत काढला आहे.

भारताच्या सलामी जोडीची उत्कृष्ट फलंदाजी

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
What Jitendra Awhad Said?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा टोला, “…तर धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका

पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावले. यासह यशस्वी आणि केएल राहुल यांनी २०१ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियात भारतासाठी पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. याआधी कोणत्याही भारतीय सलामी जोडीने २०० धावांचा टप्पा ओलांडला नव्हता. राहुल-यशस्वीच्या जोडीने हा पराक्रम केला आहे. यापूर्वी १९८६ मध्ये सुनील गावस्कर आणि के श्रीकांत यांनी भारताच्या पहिल्या विकेटसाठी १९१ धावांची भागीदारी केली होती. यानंतर आता तब्बल ३८ वर्षांनंतर या दोन्ही फलंदाजांनी हा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम आपल्या नावावर केला.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जैस्वालचे ऐतिहासिक शतक, ४७ वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियात केली ‘ही’ कामगिरी; सेलिब्रेशनचा VIDEO

भारतीय सलामी जोडीची ऑस्ट्रेलियात सर्वात मोठी भागीदारी

२०१ धावा – यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ( पर्थ, २०२४)
१९१ धावा- सुनील गावस्कर आणि क्रिस श्रीकांत (सिडनी, १९८६)
१६५ धावा- सुनील गावस्कर आणि चेतन चौहान (मेलबर्न, १९८१)
१४१ धावा – आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग (मेलबर्न, २००३)
१२४ धावा- विनू मांकड आणि चंदू सरवटे (मेलबर्न, १९४८)*
१२३ धावा – आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग (२००४)

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना, एअरपोर्टवर पत्नी रितिकाने ‘असा’ दिला भावनिक निरोप; VIDEO होतोय व्हायरल

तत्त्पूर्वी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जैस्वाल आणि केएल राहुलने मिळून टीम इंडियाची धावसंख्या ४७ षटकांत दुसऱ्या डावात १२६ धावांपर्यंत नेली. यासह टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ७६ वर्षांनंतर १०० अधिक धावांची भागीदारी केली होती.

हेही वाचा – IND vs AUS: यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम, कसोटीत एका कॅलेंडर वर्षात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

यशस्वी जैस्वालचे ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक शतक

टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने या सामन्यात २०५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने षटकारासह आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात केएल राहुलने यशस्वी जैस्वालला चांगली साथ दिली. केएल राहुलच्या बचावत्मक फलंदाजीमुळे यशस्वीलाही धीर मिळाला आणि त्यानेही सावध फलंदाजीने सुरूवात करत नंतर आपला विस्फोटक अंदाज दाखवत शतक पूर्ण केले. राहुललाही शतक करण्याची मोठी संधी होती परंतु तो ७७ धावांवर बाद झाला. या सामन्यात केएल राहुलला मिचेल स्टार्कने बाद केले आणि दोन्ही फलंदाजांमधील ही ऐतिहासिक भागीदारी तुटली.

Story img Loader