पीटीआय, ब्रिजटाऊन (बार्बाडोस)

वातावरण आणि खेळपट्टी लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे चांगली कामगिरी करूनही अनेकदा मला पुढील सामन्यासाठी संघाबाहेर राहावे लागते. मात्र, मला आता याची सवय झाली आहे, असे वक्तव्य भारताचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने केले.

A case has been registered against the three who assaulted the policeman on patrol Mumbai news
गस्तीवरील पोलिसाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bhandup, security guard, Security Guard Brutally Beaten to Death, murder, gym trainer, entry dispute, Dream Society, Mumbai, arrest, police
इमारतीमध्ये जाण्यास रोखल्याने सुरक्षा रक्षकाची हत्या
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
Pune Police, Kalyani nagar accident, Juvenile Justice Board, Vishal Agarwal, prosecution, accident car, passport, court hearing, charge sheet, bail, judicial custody
कल्याणीनगर अपघात प्रकरण : मुलाविरुद्ध सज्ञान समजून खटला चालविण्याची पोलिसांची मागणी
Demand for money pune, Hadapsar police,
पुणे : जोगवा मागणाऱ्या एकाकडे हप्त्याची मागणी, हडपसर पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
akola 10 year old girl raped
Akola Sexual Assault: धक्कादायक! १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, ठार मारण्याची धमकी देऊन…
pandharpur vitthal Rukmini temple marathi news
विठ्ठलाच्या दर्शनासाठी पैसे देणाऱ्यावरही गुन्हा दाखल होणार : औसेकर महाराज

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर कुलदीपला भारतीय संघात सातत्याने स्थान मिळालेले नाही. कुलदीपने गेल्या काही काळापासून आपल्या गोलंदाजीत वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला असून या मेहनतीचे फळ त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळाले. त्याने केवळ सहा धावांच्या मोबदल्यात चार गडी बाद केले आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला. विंडीजविरुद्ध मिळालेल्या संधीचे सोने केल्याचे समाधान असल्याचे पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर कुलदीप म्हणाला.

‘‘वातावरण आणि त्यानुसार केलेली संघाची रचना, यामुळे मला बरेचदा संघाबाहेर राहावे लागते. मात्र, मला आता याची सवय झाली आहे. मी सहा वर्षांहूनही अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे संघातून आत-बाहेर होणे ही माझ्यासाठी सामान्य गोष्ट झाली आहे,’’ असे कुलदीपने सांगितले.

तसेच गोलंदाजी आणि मानसिकतेतील बदलाबद्दल विचारले असता कुलदीप म्हणाला, ‘‘मी आता बळी मिळवण्याचा फारसा विचार करत नाही. मी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा माझा प्रयत्न असतो.’’कुलदीपने या वर्षी नऊ एकदिवसीय सामन्यांत १९ गडी बाद केले आहेत. मात्र, क्रिकेटच्या तीनही प्रकारांत त्याला सातत्याने संधी मिळालेली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कुलदीपने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत आठ बळी मिळवतानाच ४० धावांचेही योगदान दिले होते. परंतु दुसऱ्या कसोटीसाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही.

‘‘गेल्या दीड वर्षांत, दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करताना मी केवळ योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. गोलंदाज म्हणून तुम्हाला कधी बळी मिळतात, तर कधी मिळत नाहीत. मात्र, तुम्ही सातत्याने चांगली गोलंदाजी करणे गरजेचे असते. सामन्याची परिस्थिती लक्षात घेणेही आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी संघाने चार-पाच गडी लवकर गमावले असले, तरच मी गोलंदाजीत वैविध्य आणतो. अन्यथा माझा एक टप्पा धरून गोलदांजी करण्याचा प्रयत्न असतो,’’ असे कुलदीपने नमूद केले.

भारताचे मालिकेत विजयी आघाडीचे लक्ष्य!

पहिल्या सामन्यातील मोठय़ा विजयानंतर भारतीय संघाचे आज, शनिवारी होणारा वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे लक्ष्य असेल. तसेच भारतीय संघाचे फलंदाज या सामन्यात आपल्या नियमित क्रमांकांवर खेळणे अपेक्षित आहे.

’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स, जिओ सिनेमा, फॅनकोड अ‍ॅप